Friday, April 19, 2024

/

शहरातील रहदारीचा प्रश्‍न कायम….

 belgaum

शहरातील मध्यवर्ती भागातील मुख्य रस्त्याचा रहदारीचा गुंता दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. वाहनधारकांच्या बेशिस्तपणामुळे रस्त्याची समस्या अधिक गंभीर होत आहे. या समस्येवर वाहतूक पोलीस तात्पुरती मलम पट्टी करत असल्याने मात्र त्याचा फारसा काही फायदा होतांना दिसत नाही. बेळगावकरांना शहरातील रस्त्याच्या रहदारीच्या समस्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची अपेक्षा प्रशासनाकडे करण्यात येत आहे. शहरातील रहदारिचा गुंता सुटेन का? असा प्रश्‍न नागरिंकाकडून उपस्थित होत आहे.

शहरातील वाढत्या लोकसंख्ये बरोबरच वाहनांची संख्यादेखील अधिक झपाट्याने वाढत आहे. . त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर नेहमीच वाहतूकीची कोंडी होते.  अनेक रोडावरील बाजार पेठेत शहरासह ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात बाजार करण्यासाठी दाखल होत असतात. त्यात हॉकर्स,दुचाकी,चारचाकी वाहन धारकांचा शिरकाव होत असल्यामुळे एकदंरीतच वाहतूकीची कोंडी होते. आणि त्यामुळे पादचार्‍यांना पायी चालतांना मोठी कसरत करावी लागत आहे.

Traffic problem

पोलीस वाहतूक शाखेकडून कारवाईची मागणी

लग्नसराई सुरू असल्यामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील लोक लग्नसराईच्या खरेदीसाठी शहरात जमत असतात. त्यामुळे अनेक चौक,बसस्थानक,दुर्गा मंदिर ,तसेच अनेक ठिकाणी खरेदीसाठी आलेल्या लोकांचे वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतूकीची वर्दळ होते.

शहरातील मुख्या चौकांमध्ये शहर वाहतूक शाखेचे विविध ठिकाणी पोलीस कर्मचारी नियुक्त केले पाहिजेत पंरतू ह्या बेशिस्त वाहतूकीकडे दुर्लष केल्याचे दिसून येत आहे. वाहतूक शाखेकडून योग्य ती कारवाई झाल्यास रहदारीचा हा प्रश्‍न पुर्णपणे सुटला नाही तरी काही प्रमाणात नागरिकांना दिलासा तरी मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. शिवाय अनेक रोडवर फेरीवाल्यांच्या मनमानीस लगाम लावण्यासाठी महापालिकेने देखील खंबीर पाऊल उचलने गरजेचे आहे.

काही मुजोर फेरीवाले  रस्त्यावर बसविण्यासाठी रस्त्यातच गाड्या थांबवितात. त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होतो. अशा फेरीवाल्यांना दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे.

पार्किंग व्यवस्थेचा प्रश्‍न बिकट

शहरातील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहणे पार्किंग करण्यासाठी रस्त्याच्या कडेला पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने वाहन चालक रस्त्याच्या कडेचा रोड सोडून तर काही रस्त्याच्या मधोमध गाड्या लाऊन निवांत बाजारात फीरतात. आडवे, उभे लावलेल्या वाहनांमुळे गल्लीबोळातून सुध्दा एकच गर्दी होते. त्यासाठी महापालिकेने वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.

तसेच छत्रपती श्री धर्मवीर संभाजीराजे चौकाजवळ नेहमीच मोकाट जनावरांची झुंड रस्त्याच्या मधोमध बसलेली दिसते. त्या जनावरांना कोणी बाहेर काढत नाही. त्यांचा काहीही बंदोबस्त केला जात नाही. विक्रेत्यांच्या दुकानापुढे जनावरं गेल्यावर तेवढेच व्यापारी हाकतात मात्र ते फिरून पुन्हा तेवढ्याच जागेत बिनधास्त फिरतात. कारण त्यांचा कोणीच वाली नाही. ह्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त होण्याची गरज आहे.

लोकप्रतिनिधींचे जनतेकडे दुर्लक्ष
नागरिकांच्या रोजमराच्या जीवनातील ही वाहतूकीच्या कोंडीचा समस्या मांडण्यासाठी अनेक माध्यमांनी मालिका लावल्या परंतू गाढ झोपलेले प्रशासनास जाग येत नाही. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी एकमेंकावर चिखलफेक करण्यात व्यस्त असल्यामुळे त्यांना या समस्यांकडे पहायला वेळ नाही. शहरातील हा रहदारीचा गुंता कधी सुटेल असा प्रश्‍न उपस्थित करण्याशिवाय नागरिकांना आता तरी दुसरा पर्याय नाही.

माहिती सौजन्य: सुनील जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.