Friday, April 19, 2024

/

महामार्ग पूल बनवतांना तीन कामगार ठार

 belgaum

बेळगाव ते गोवा महामार्गाचे काम करीत असताना देसुर नजीक उड्डाणपूल बनविण्याच्या कामातील तीन कामगार अंगावर मातीचा ढिगारा कोसळून ठार झाले आहेत. या कामगारांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न बेळगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.
सूकंदराम ( वय २५ ), अर्जुनसिंग (वय ३२) व दुर्गेश राम ( वय २६) अशी त्यांची नावे समजली असून ते सर्व उत्तर भारतीय आहेत.

आज सकाळी पासून उड्डाणपूल बांधण्याच्या कामावर ते होते. महामार्गाच्या टप्प्यातून जात असलेल्या रेल्वे लाईन वर उड्डाणपूल बनविण्यात येत असताना मातीचा ढिगारा त्यांच्या अंगावर कोसळला असून ते गुदमरून ठार झाले.

महामार्गाचे बेळगाव ते खानापूर या टप्प्यातील काम करणाऱ्या अशोका कंपनीचे ते कामगार होते. त्यांचे मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहेत.
महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून अनेक छोटे मोठे अपघात घडलेले आहेत पण इतकी मोठी दुर्घटना पहिल्यांदाच घडली असून यामध्ये तिघांचा बळी गेला आहे. काम मिळत नाही म्हणून पोटासाठी आपले राज्य सोडून दुसऱ्या राज्यात आलेल्या या तीन तरुणांना आपला जीव गमवावा लागला असून कामगारवर्गात हळहळ आहे.

 belgaum

घटनास्थळी डी सी पी सीमा लाटकर ग्रामीण पोलीस निरीक्षक शिवयोगी यांनी देखील घटनास्थळी पहाणी मातीचा ढिगारा उपसून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.