सीमाप्रश्नी युवक जागृत झाल्यानंतर, त्याने कर्नाटका बरोबरच महाराष्ट्राला हलविण्यास सुरुवात केली आहे. बेळगावातील युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक आंदोलने करतानाच महाराष्ट्राला जागे करण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर भव्य धरणे आंदोलन छेडले होते. याची फलश्रुती म्हणून महाराष्ट्र सरकारला उच्चाधिकार समितीची बैठक घ्यावी लागली आहे.
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी देखील बेळगावातील जनतेला आश्वासन दिलं होतं शब्द दिला ही बैठक घेण्यात त्यांचा पुढाकार देखील तितकाच महत्वाचा आहे त्यांच्या पाठ पुराव्या मुळेच फडणवीस सरकारला बैठक घ्यावी लागली हे देखील तितकेच खरें आहे.या शिवाय मध्यंतरी समिती नेत्यांनी मुख्यमंत्री आवासा समोर आंदोलनाचे शस्त्र उपसले होते ते देखील निर्णायक ठरले त्यामुळे भाजप सरकार आणि समनवंयक मंत्री जागे झाले आहेत.
युवकांच्या आणि समितीच्या रेट्यामुळेच हे शक्य झाले असून अनेक वर्षे लांबलेली ही बैठक होऊ शकली आहे. सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू खंबीरपणे मांडण्यात येत आहे .मराठा आरक्षणप्रमाणेच सीमाप्रश्नावर सुद्धा पूर्ण ताकदीने व प्रभावीपणे न्यायालयात बाजू मांडण्यात यावी यासाठी ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांच्या बरोबरच आणखी एक ज्येष्ठ विधिज्ञ नियुक्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत या ज्येष्ठ वकील यांची नव्याने नियुक्ती झाल्यानंतर त्यांना माहिती देऊन पुढील व्यूहरचना करण्यासाठी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात यावी या बैठकीस महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी उपस्थित राहावे असे बैठकीत ठरवण्यात आले आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयातील खटल्याच्या प्रत्येक तारखेच्या वेळी राज्याचे प्रतिनिधी म्हणून मंत्री पाटील व देसाई हे स्वतः तसेच सामान्य प्रशासन विभागाचे सचिव उपस्थित राहतील असे या बैठकीत ठरविण्यात आलेले आहे.
मराठा आंदोलनानंतर मराठा समाजाला दिलेल्या शैक्षणिक व आर्थिक सवलती सीमाभागातील मराठी भागातील नागरिकांनाही देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.
उच्चाधिकार समितीची बैठक झाल्यामुळे हे सारे साध्य होऊ शकले असून याला कारणीभूत युवा समितीने आझाद मैदानावर करण्यात आलेले आंदोलन असल्याची प्रतिक्रिया सीमाभागातून व्यक्त होत आहे. कोणत्या परिस्थितीत लवकरात लवकर उच्चाधिकार समितीची बैठक घ्या अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती या मागणीमुळे तसेच मुंबईत जाऊन केलेल्या आंदोलनामुळे सरकारला जागे व्हावे लागले आहे त्यामुळे युवा कार्यकर्त्यांचे अभिनंदन करावे तितके कमीच आहे.