Friday, April 19, 2024

/

खानापूर यात्रेपूर्वी रस्ते करा- अंजलीईंकडून मंत्री धारेवर’

 belgaum

तुमचं काम सुरू होई पर्यंत यात्रा काळ संपेल त्यामुळे खानापूर महालक्ष्मी यात्रेपूर्वी रस्त्यांचे काम पूर्ण करा असा संतप्त सवाल करत आमदार अंजलीताई यांनी सार्वजनिक बांधकाम खाते मंत्री एच डी रेवननां यांना धारेवर धरले.

बुधवारी विधान सभेत अंजलीताई यांनी हा प्रश्न उपस्थित करत रस्ता करा अशी मागणी केली.

ANJli revanna bsy

जर का हसन रामनगर भागात रस्ता विकास असेल तर इतका उशीर झाला असता का?दर बारा वर्षांनी खानापूर शहरात महा लक्ष्मी यात्रा भरत आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

जो पर्यंत रस्त्याचे काम होईल तेंव्हा यात्रा संपलेली असेल असे त्यांनी म्हटल्यावर विरोधी पक्ष नेते बी एस येडीयूरप्पा यांनी हस्तक्षेप करत आमदारांची मागणी पूर्ण करा हा रस्ता लवकर करून द्या असे मंत्री रेवनना यांना उद्देशुन म्हटले. त्यावर प्रतिक्रिया देताना रेवन्ना म्हणाले की येडीयुरप्पा यांनी म्हटल्यावर आम्ही रस्त्याच काम करणे शक्य आहे का असा प्रतिप्रश्न केला.त्यावर बोलताना स्पीकर रमेश कुमार म्हणाले देवांनी सांगितल्या वर तुम्हाला आणखी काय हवंअसे म्हणत पुढच्या विषयावर गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.