Tuesday, April 30, 2024

/

वाजपेयींच्या जाण्याने नुकसान: शंकरगौडा पाटील

 belgaum

भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक महत्वाचे सदस्य आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा मृत्यू हे संपूर्ण देशाचे न भरून येणारे नुकसान आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ स्थानिक नेते शंकरगौडा पाटील यांनी बेळगाव live ला दिली.

वाजपेयीजी बेळगावला अनेकदा आले. आपले त्यांच्याशी एक जुना कार्यकर्ता असल्याने घनिष्ठ संबंध होते. यामुळे भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराला त्यांना आम्ही घेऊन येत होतो. १९९२ मध्ये सी एम पाटील यांच्या विधानसभा निवडणूक प्रचाराला ते आले होते. १९९४ मध्ये आपण स्वतः शंकरगौडा पाटील निवडणुकीला उभारलो होतो तेंव्हाही स्वयं स्फूर्तीने ते आले होते.

Vajpeyi shankar gowda

 belgaum

२००४ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होती तेंव्हा पुन्हा मी विधानसभेला उभा होतो, आणि अंगडी लोकसभेला उभे होते तेंव्हाही वाजपेयीजी प्रचाराला आले होते.बेळगावमध्ये ज्येष्ठ नेते आप्पासाहेब मुतगेकर यांच्याशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील गाव म्हणून बेळगाव बद्दल त्यांना विशेष आपुलकी होती.वाजपेयी 1960 च्या दशकात बेळगावला आले की उद्योजक कै रामभाऊ सरदेशपांडे यांच्याकडे रहायला असायचे असेही पाटील म्हणाले.

बेळगाव बद्दल त्यांनी योगदान दिले आहे. त्यांनी केलेल्या पुणे बंगळूर महामार्गाने बेळगावला विकास पाहता आला. जुन्या नेत्यांमध्ये बॅ नाथ पै यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध होते.पंतप्रधान असताना बेळगाव येथील लष्करी तळाच्या विकासाला त्यांनी प्राधान्य दिले होते.एम ए अंगडी, श्रीकांत वेरनेकर,आण्णा गाडगीळ बाबुराव हंडे व परमानंद गोधवाणी हे नेतेही त्यांच्या जवळचे होते. अशी माहिती त्यांनी सांगितली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.