Friday, April 19, 2024

/

‘चीड बेकीची आणि गरज एकीची’

 belgaum

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शाहिरांचे योगदान अनमोल आहे वास्तविक पत्रकार आणि साहित्यिक शाहीरानीच लढा पेटवला होता कालांतराने संयुक्त महाराष्ट्रातील लढ्याचे केंद्र बिंदू असलेली मुंबई महाराष्ट्राला मिळाली मात्र बेळगाव सह सीमा भाग अजूनही कर्नाटकातच खितपत पडला आहे.

बेळगाव मध्ये या गेल्या डिसेंबर महिन्यात अखिल भारतीय शाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होत. शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी म्हटलेल ‘माझी मैना गावावर राहिली…माझ्या जीवाची होतेय कायली’ या  गाण्याने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जाण आणली होती.‘चीड बेकीची गरज एकीची’त्याच गाण्यातील या ओळी आज विधान सभा निवडणुकांच्या निमित्ताने बेळगावातील मराठी नेत्यांना लागू पडत आहेत.

SAthe

 belgaum

महाराष्ट्र एकीकरण समितीत असलेल्या दोन गटांत समेट घडवून एकत्र आणण्याचे काम जोरात सुरु आहे समितीचे पाईक म्हणून युवक आणि कै सुरेश हुंदरे मंच म्हणून सीमा लढ्यातील जेष्ठ कार्यकर्ते राम आपटे यांच्या नेतृत्वात एकीची प्रक्रिया राबवली जात आहे.मागील २०१३ च्या विधान सभा निवडणुकीत बेळगाव दक्षिण आणि खानापुरात असे दोन समितीचे आमदार निवडून आले होते यावेळी हे समितीचे बालेकिल्ले राखायचे झाल्यास दोन्ही गटांची एकी होणे काळाची गरज आहे.

बेकी किंवा फुट,अंतर्गत गटबाजी बेळगावातील मराठी मतदार संघात निवडणूक लढणाऱ्या भाजप आणि कॉंग्रेस पक्षात देखील आहेच मात्र समितीच नेतृत्व दिशाहीन होत असल्याने याचा फटका सामान्य मराठी भाषकाला बसणार आहे.एकीकरण समितीतील फुट अंतर्गत धुसफूस डॅमेज कंट्रोल दूर करण्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी वाढू लागली आहे.समिती नेत्यात पद आणि सत्तेसाठी बेकी आहे बिचारी जनता मात्र एक आहे शेवटी जनता रस्त्यावर उतरून नेत्यात एकी घडवण्यासाठी प्रयत्नशील असते असे आगळे उदाहरण जगात केवळ बेळगावातच दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.