पावसाने पुन्हा एकदा कोसळला राष्ट्रध्वज
देशातील सर्वात उंच असा दावा होत असताना आज पुन्हा एकदा किल्ला परिसरात उभारण्यात आलेला राष्ट्रध्वज कोसळला आहे. नुकत्याच झालेल्या वारा, गारपीट आणि तुफान पावसाने ही परिस्थिती झाली.
सलग तिसऱ्यांदा ही परिस्थिती निर्माण झाली असून राष्ट्रध्वजाचा अप्रत्यक्षपणे अवमान केल्याचाच प्रकार घडत आहे. आजच्या वारा आणि पावसाने तर पहिल्यांदा वरील दोन भाग फाटून पडले असून त्यानंतर खालचा भाग पडला आहे.
अशास्त्रीय उभारणी आणि कमी दर्जाच्या कपड्याचा वापर ही कारणे असण्याची शक्यता असून यामुळे राष्ट्रीय ध्वजसंहितेचा अपमान झाला आहे, असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून काळजी घेण्याची गरज आहे.