Friday, March 29, 2024

/

शहर समिती नेते नेमके काय साधणार?

 belgaum

बेळगाव शहर समिती नेते मंडळी निवडणुकीच्या तोंडावर नसते उद्योग करून नेमके काय साधणार? असा प्रश्न सामान्य सीमावासीयांना सध्या नक्कीच पडला आहे. प्रा एन डी पाटील आणि इतर नेत्यांनी २०१३ मध्ये नेमलेल्या शहर समिती कार्यकारिणीलाच हरताळ फासून नवी समिती आणि तिची बैठक ठेवली आहे, अशा नेत्यांमुळे शहरातील दोन मतदार संघात समितीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

City mes list
मागील विधानसभेच्या तोंडावर एकि करून किरण बाबुराव ठाकूर यांना अध्यक्ष करण्यात आले. दीपक दळवी हे कार्याध्यक्ष म्हणून निवडले. माधवराव चव्हाण आणि टी के पाटील हे उपाध्यक्ष, मालोजी शांताराम अष्टेकर हे सरचिटणीस, किरण गावडे व नगरसेवक विजय पाटील हे चिटणीस व प्रकाश मरगाळे व किरण सायनाक हे खजिनदार पदावर निवडले होते.
निवडणूक झाली, बेळगाव दक्षिण चे आमदार संभाजी पाटील झाले. त्यानंतर लगेचच किरण ठाकूर यांनी कधीच राजीनामा दिलेला नसताना पुन्हा दीपक दळवी यांनी स्वतः अध्यक्ष म्हणून घेऊन कार्यक्रम करण्यास सुरू केले, इकडे किरण ठाकुरही अध्यक्ष म्हणूनच ओळखले जातात, पुढे दीपक दळवी हे मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष झाले तरीही शहर समितीचे स्वयंघोषित अध्यक्ष म्हणून घेण्याची त्यांची हाव कमी झाली नाही आणि आत्ता तर निवडणूक तयारीसाठीही शनिवारी त्यांनी स्वतः अध्यक्ष म्हणून सही करून बैठक बोलावणीचे पत्रक काढले आहे.
आजपर्यंत किरण ठाकूर हे अधिकृत निवड झालेले अध्यक्ष असूनही त्यांनी या स्वयंघोषित अध्यक्षावर कधी हरकत घेतलेली नाही. त्यांनी आक्रमक होऊन तसे केले नाही पण यामुळे शहराच्या दोन्ही मतदार संघात दोन दोन उमेदवार उभे राहण्याचा धोका निर्माण आहे. दीपक दळवी आणि किरण ठाकूर यांनी समितीच्या हितासाठी वाद मिटवून घ्यावा ही गरज आहे, दळवी यांनी स्वतः मध्यवर्तीचा अध्यक्ष असतांना शहर या घटक समितीच्या कार्यात अशी ढवळाढवळ न करता मार्गदर्शकाची भूमिका घ्यावी अशी मागणी युवा कार्यकर्ते करत आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार येऊन गेले, त्यांनी निवडणुकीत मार्गदर्शनाची जबाबदारी ज्येष्ठ नेते भाई एन डी पाटील यांना दिली आहे. त्यांनी तरी आता या पदाच्या आहेत होरपळणाऱ्या आणि भाषेच्या लढ्यात बेकीचे राजकारण खेळणाऱ्या नेत्यांना शहाणे करावे, अशी सामान्य जनतेची मागणी आहे.
किरण ठाकूर हे समितीचे अध्यक्ष असतांना दीपक दळवी यांनी स्वतःला अध्यक्ष म्हणून घेऊन बैठक घेणे हे पुन्हा बेकीलाच आमंत्रण देण्यासारखे आहे. शरद पवार यांच्या सभेवेळीही याचा प्रत्यय आला असून एकि साठी प्रयत्न करणाऱ्या युवा वर्गानेही या बद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
या बैठकीच्या प्रयत्नांनाही आतापासूनच विरोध सोशल मीडियावर सुरू आहे, यातून बोध घेऊन नेत्यांनी आपला स्वार्थ बाजूला ठेवावा, असा जनतेच्या मनातला इशारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.