Saturday, April 20, 2024

/

घटक समित्यांनी उमेदवार निवडावेत – मध्यवर्ती समितीत निर्णय

 belgaum

आगामी विधान सभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडी अधिकार घटक समित्यांना देण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेल्या मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी यांनी हा निर्णय जाहीर केला.
मंगळवारी सायंकाळी शहरातील मराठा मंदिरात मध्यवर्ती समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार संभाजी पाटील अरविंद पाटील ,मध्यवर्ती सरचिटणीस मालोजी अष्टेकर माजी आमदार दिगंबर पाटील यांच्यासह मध्यवर्ती कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
निवड प्रक्रिया पारदर्शक व्हावी या हेतून घटक समित्यांनी कमिट्या नियुक्त करून विभागवार उमेदवार निवडावे आणि आगामी १० एप्रिल पर्यंत मध्यवर्ती समितीकडे सोपवावे मध्यवर्ती समिती सर्व उमेदवार जाहीर करेल असे देखील दळवी यांनी स्पष्ट केल.
निवडणुकीसाठी अवधी कमी असल्याने वेळ वाया न घालवता सर्व घटक समित्यांनी कार्यक्रम ठरवावे आणि लवकर निवड प्रक्रिया सुरु करावे असे आवाहन केल.कॉम्रेड कृष्णा मेणसे राम आपटे आणि किसन येळ्ळूरकर असे लढवय्ये देखील आपापल्या परीने प्रचाराला लागणार आहेत त्यामुळे सर्वाना विश्वासात घेऊन उमेदवारी ठरवा अस देखील दळवी म्हणाले.
रणजीत चव्हाण पाटील यांनी टक्के अल्पसंख्याक असलेल्या समाजाचे दोन दोन आमदार निवडून येतात बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाचे आमदार निवडून येऊ शक नाहीत हे दुर्दैव असून आगामी काळात मराठी माणूस कसा आमदार होईल याकडे सर्वांनी प्रयत्न केल पाहिजे असे मत मांडले. आमदार संभाजी पाटील यांनी आगामी निवडणुकीत अधिकाधिक आमदार निवडूनआणण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली. माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले की अवधी कमी असल्याने उमेदवार कोण हे पाहून काम करण्या पेक्षा समितींचा उमेदवार म्हणून सर्वांनी काम करावे असे आवाहन केल आचार संहितेचे नियमांचे काटेकोर पणे पालन करण्यासाठी वकिलांची एक टीम मध्यवर्तीने नियुक्त करावी आणि मराठी मतदार याद्या लवकर उपलब्ध व्हाव्यात यासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यान एक शिष्टमंडळ भेटून मागणी करू अस सांगितले.
अध्यक्ष सरचिटणीस यांच्यात मतभेद
मध्यवर्ती पाच आमदार निवडून आणू असे वक्तव्य करते मात्र प्रत्यक्षात निपाणी आणि यमकनमर्डी बाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी करताच अध्यक्ष दळवी आणि मालोजी अष्टेकर यांच्या बैठकीत वैचारिक मतभेद झाले शेवटी निपाणी आणि यमकनमर्डी आणि बिदर बाबत ही निर्णय घेऊ असे ठरवण्यात आले.Mes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.