Friday, May 17, 2024

/

भाजपला म्हादाई तिढा सोडवण्याचा पुळका आताच का?

 belgaum

SIdhu shahगुजरात मध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ला यश मिळवता आले नसले तरी बऱ्यापैकी जागा मिळवून भाजपची पुरी दमछाक केली हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही.
भाजपला 99 तर काँग्रेस ला 80 जागा मिळाल्याने केंद्रीय भाजप नेतृत्वाची घाबरगुंडी उडाली आहे त्यामुळेच की काय कर्नाटक  काँग्रेस मुक्त करण्याची घोषणा केलेल्या भाजपने कर्नाटक काबीज करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला गोवा कर्नाटक महाराष्ट्र या तीन राज्यातील म्हादाई  पाणी तंटा लवकरच सोडवण्यात येईल अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरापा यांनी केली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकात होऊ घातलेल्या विधान सभा निवडणुकीत भाजपच्या पक्ष श्रेष्ठीना राज्यात काँग्रेस बाजी मारणार असल्याची शक्यता वाटल्यानेच काँग्रेसला बहुमता पासून रोखण्यासाठी म्हादाई नवीन कार्ड ओपन केल असल्याचे राजकीय वर्तुळात मानलं जात आहे.वास्तविक म्हादाई कळसा भांडुरा वाद हा केवळ गोवा कर्नाटक यांचाच नसून त्यात महाराष्ट्र देखील थर्ड पार्टी आहे संबंधित तिन्ही राज्यांना विश्वासात घेऊन हा तिढा सोडवणे गरजेचे आहे.
एकीकडे गुजरात निवडणुकीच्या निकालात जरी काँग्रेस पराभव झाला असला तरी देशात  त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे  तर दुसरीकडे भाजप बॅक फुटवर गेलाय हे कर्नाटकातील भाजपच्या राजकीय चालींवरून दिसून येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.