बेळगावात आठव्या अण्णाभाऊ साठे साहित्य संमलेनाचे उदघाटन
देशात गेल्या ६० वर्षात बदल करण्यासाठी सामाजिक चळवळ उभी करण्यात आली . ही सामाजिक चळवळ शाहू ,फुले ,आंबेडकर ,गांधी यांचे विचार घेऊन वाटचाल करत आहे . आज हे विचार आपल्याला उपयोगी तरी अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या नवीन समस्या सोडविण्यासाठी पूर्णता उपयोगी पडतील की नाही याचा विचार करायला हवा असे विचार स्पष्ट पद्मश्री ,जेष्ठ भाषा तज्ञ गणेश देवी यांनी मांडले.
बेळगाव येथे लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या ८ व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. जाती व्यवस्थेची मटकी फोडत वेगळ्या पद्धतीने साठे साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी बेळगावच्या महापौर संज्योत बांदेकर,कॉम्रेड भालचंद्र कांगो,कॉ उमा पानसरे, जेष्ठ लेखक उत्तम कांबळे,कॉ नागेश सातेरी,प्रा संध्या देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्ष विदेशी इंग्लिश भाषा विध्यापीठ हैद्राबाद माया पंडीत या होत्या.
देशात फार पूर्वी पासून समाजात बदल घडवण्याच महान कार्य साहित्याने केले आहे . बदल घडवणे ही साहित्याची जबाबदारी देखील आहे भारत आणि चीन,इजिप्त देशात हे कार्य झालय त्या प्रकारे युरोप मध्ये झालेले नाही युरोप मध्ये सामाजिक बदलाचा विचार साहित्याच्या बाहेरून निर्माण झालाय .सध्याच्या गोंधळाच्या वातावरणात देशात नवीन रस्ता तयार करायचा मोठी जबाबदारी साहित्य आणि साहित्यिकांवर आहे असे देखील देवी म्हणाले.
लोकांच्या मदतीने निर्माण झालेली सत्ता म्हणजे लोकशाही आहे. सत्ता आज स्थितीत ती लयाला येऊन पोचली आहे. जर्मनीत उजव्या विचार सरणीच्या पाठींब्या शिवाय सरकार बनूच शकत नाही हि परिस्थिती आहे . फ्रांस मध्ये दोन वर्ष पूर्वी दशहतवादमुळे अराजकता माजली होती. टर्की देखील काही कारणाने अडचणीत आहे. संपूर्ण जगात लोकशाही पोखरून निघालेली आहे. पोखरली जावी अशी परिस्थिती देखील आहे . खरी सत्ता स्टेट कडे नसून ज्यांनी स्टेट पोखारलय अश्या सत्ता राज्य करत आहेत . यात बदल करायचे असेल तर नवे रस्ते शोधायला हवेत. साहित्यिकांनी आपले समाज परिवर्तनाचे विचार मांडण्यासाठी बलिदान देण्यासाठी क्षणभर मागे पुढे पाहणार नाहीत . प्रत्येक साहित्यिक दाभोळकर पानसरे कलबुर्गी लंकेश व्हायला मागे हटणार नाहीत तर ते साहित्यिक नव्हेत असे देखील देवी शेवटी म्हणाले.
आकर्षक दिंडी
उद्घाटन कार्यक्रमाच्या अगोदर छत्रपती शिवाजी उद्यान पासून महात्मा फुले रोड मार्गे गोवावेस मराठा मंदिरा पर्यंत आकर्षक दिंडी काढण्यात आली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुस्तकाचे अनेक फक्त हातात घेऊन मराठी विद्यानिकेतन शाळेच्या विध्यार्थिनी फेरीत सहभागी झल्या होत्या मराठ मोळ्या लेझीम पथक आणि भजनी मंडळ देखील या फेरीत होते. महापौर संज्योत बांदेकर यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीच उद्घाटन झाल.
स्थानिक शाहिरांचा सत्कार
बेळगाव सीमा लढ्यात आपल्या शाहिरीतून योगदान दिलेले शाहिरांचा सत्कार यावेळी करण्यात आला . शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या शाहिरीतून दिलेले योग्दनांची आठवण म्हणून बेळगाव लढ्यासाठी काम केलेले शाहीर मनोहर भातकांडे, यल्लापा बिर्जे, निन्गोजी हुद्दार आणि सध्या लोकप्रिय असलेले शिवाजी चंदगडकर यांचा सत्कार कॉम्रेड माजी महपौर नागेश सातेरी यांनी केला.