शहराबाहेर जाताना खासगी बस चा प्रवास आणि तो ही सण उत्सव काळात म्हणजे प्रचंड लूट हे गणित आहे. खासगी बसचालक आपले दर चौपटीने वाढवतात आणि ते म्हणतील तितका दर प्रवाशांना द्यावा लागतो.
पण टाइम्स ऑफ इंडिया ने छापलेल्या बातमी नुसार वाहतूक खाते आता खासगी बसचे तिकीट दरही निश्चित करणार आहे. हे खरे झाले तर लूट थांबू शकेल.
वाहतूक खात्याने सरकारकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे. वातानुकूलित बसना ४५ आणि साध्या बसना ३५ रुपये प्रति किमी दर निश्चित केला जावा एकूण प्रवास दराच्या रकमेला प्रवासी संख्येने भागून तिकीट घेण्यात यावी असा प्रस्ताव आहे.
उत्सव आणि सण काळातही जास्तीतजास्त किती दर घ्यावा हे सुद्धा वाहतूक खाते ठरवेल यामुळे लूट होणार नाही शिवाय ५०० चे तिकीट २५०० लाही विकले जाणार नाही.