राज्योत्सवात मिरवणुकीत धाडधिंगाना घालणाऱ्या कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या कानपिचक्या जिल्हा पोलीस अधीक्षक रविकांत गौडा यांनी काढल्या आहेत . सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्योत्सव मिरवणूक आयोजन तयारी बैठकीत बोलताना त्यांनी कन्नड संघटनांना घरचा आहेर दिला आहे . सी पी एड मैदानावर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात स्टेज समोर ७५० खुर्च्या लावलेल्या असतात त्या खुर्च्या रिकाम्याच असतात अगोदर सांस्कृतिक कार्यक्रमात लोक जमवा बोला अश्या खोचक शब्दात एस पी यांनी कानपिचक्या केल्या आहेत.
सरकारी कार्यालयावर कन्नड फलक लावा सर्वत्र कन्नड इम्प्लिमेंट करा असं म्हणत डी एस जिया उल्ला यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी चांगल्याच शब्दात उत्तर देत कार्यालयात राज्य भाषा कन्नडलागू करू कन्नड च बोलू असं डी सी म्हणाले. चन्नमा चौकात मंच आणि स्वागत कमान लावायला ध्या शी मागणी करत अनेक कानडी संघटनात वाद झाला यावेळी बैठकीत बराच काळ गोंधळ झाला होता. मिरवणुकीत मद्यपान बंदी असताना कन्नड संघटनेचे कार्यकर्ते मिरवणुकीत दारू पिऊन धिंगाणा घालतात हे अगोदर बंद झाले पाहिजे अशी मागणी एका महिलेने करताच सगळ्यांची बोलती बंद झाली. सरकारी मराठी शाळा आणि हायस्कुल मधून राज्योत्सव आयोजनाची सक्ती करा आसा आदेश काढा असा आग्रह देखील कन्नड संघटनाचे कार्यकर्ते करत होते
यावेळी बैठकीत डी सी पी अमरनाथ रेड्डी ,ए डी सी सुरेश इटनाळ, जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे आदी उपस्थित होते .