Friday, April 26, 2024

/

गणराय आले – हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतीक जालगार गल्लीतील गणेशोत्सव

 belgaum

Jalgar galliबेळगावातील जालगार गल्लीतील लालबहादूर शास्त्री चौकात लोकवर्गणीतून साकारलेला गणपती उत्सव हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. 1967 ला गोपाळराव नाईक नारायण हिंडलगेकर, रामचंद्र गिंडे, गोविंदराव नाईक, भालचंद्र गिंडे, ए जी नाईक, वासुदेव काकतीकर, अनंतराव गिंडे हे सर्व मिळून बेळगावातील गणपती बघण्यास जात होते त्यावेळी गल्लीतील बैठक घेऊन आपल्या गल्लीत आपण सर्वांनी मिळून मिसळून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी एक वर्ष आदी या मंडळाने 10 पैसे , चार आणे, आठ नाणे, 1 रुपये असे रोज पिग्मी प्रमाणे जमा करून 1968 ला लोकवर्गणीतून बसवला.

या मंडळाचे वैशिष्ट गणेशाच्या मंडपात मुस्लिम समाजातील मुतवली आणि त्या जमातच्या कार्यकर्त्यांचा पान सुपारी विडा, देऊन गौरविण्यात येत होते आजही हे मंडळ सर्व धर्मियांना घेऊन मंडपात महाआरतीचे आयोजन करत आले आहे. या मंडळाने माहेश्वरी अंध शाळेला देणगी देऊन सहकार्य केले आहे. या मंडळाने अनेक सामाजिक उपक्रम गल्लीत राबविले आहे गेली 10 वर्षे मंडळाच्या अध्यक्षपदी भालचंद्र गिंडे,आणि खजिनदारपद संजय नाईक यांच्या कडे मंडळाची धुरा आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.