Thursday, April 25, 2024

/

केंद्रांच प्रतिज्ञा पत्र निःपक्षपाती असावं-केंद्रीय गृहराज्यमंत्र्याकडे मागणी

 belgaum

बेळगाव सीमा प्रश्नी सुप्रीम कोर्टात केंद्राने नेहमीच अन्यायाची भूमिका घेतली आहे अनेकदा केंद्राने महाराष्ट्र विरोधी प्रतिज्ञापत्र सादर केली इथून पुढं केंद्राने सुप्रीम कोर्टात पक्षपाती प्रतिज्ञा सादर करू नये अशी मागणी केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर यांच्याकडे करण्यात आली आहे.

AHir mos

दिल्ली स्थित गृहराज्य मंत्र्यांच्या निवासस्थानी एकीकरण समिती आमदार संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळाने अहिर यांच्याशी सविस्तर चर्चा करून ही मागणी केली आहे. यावेळी अहिर यांना सीमा प्रश्नाची माहिती पुस्तिका देण्यात आली त्यानंतर अत्यंत साधक बाधक चर्चा करण्यात आली नुकताच दोन देशातील सीमा भाजप सरकारने बदलल्या आहेत तसं दोन्ही राज्यातून संयमाने सामंजस्य पणे या प्रश्नी तोडगा निघावा अशी भूमिका अहिर यांनी मांडली.
भाजप कोर कमिटीत उपस्थित करणार प्रश्न AHIr mosगेली कित्येक वर्षे आम्ही बेळगाव प्रश्न पहात असून भाजपची राष्ट्रीय कार्यकारणीत बेळगाव सीमा प्रश्न नक्कीच मांडू अस म्हणत तब्बल अर्धा तास हुन अधिक काळ माहिती पुस्तिका नकाशे आणि सीमा प्रश्नी माहिती समजावून घेतली.आगामी आगष्ट महिन्यात कोल्हापूर दौऱयावेळी बेळगावला भेट देण्याचा प्रयत्न करू अस देखील अहिर यांनी समिती नेत्यांना आश्वासन दिलं आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.