Wednesday, April 24, 2024

/

काश्मीर प्रश्नी काँग्रेसची उदासीनता कारणीभूत- राज्यवर्धन यांचा आरोप

 belgaum

2Mos rajvardhan004 ते 2014 या दहा वर्षांच्या कार्यकाळात काश्मीरला अशांती आणि सुफीजम ने घेरलं होत काँग्रेसने याकडे साफ दुर्लक्ष केलं होतं याला काँग्रेस सरकारचं नकारात्मक धोरण कारणीभूत आहे असा आरोप माहिती प्रसारण राज्य मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी केला आहे.
दोन दिवसांच्या बेळगाव दौऱ्यात दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर काश्मीर मधील बरीच स्थिती सुधारली आहे असबते म्हणाले.

भाजप सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराला ब्रेक लागला असून दिल्लीत 100 जरी रिलीज झाले तरी ते जनतेपर्यंत थेट पोचत आहेत, बेटी बचाओ स्वच्छता अभियान या सारख्या अनेक योजनामुळ सब का साथ सब विकास उद्देश्य सफल होत आहे अस स्पष्ट केलं.
लष्कर प्रमुख रावत यांच्यावर काँग्रेस ने केलेली टीका क्षुल्लक असून यातून काँग्रेस अटीट्युड झळकत आहे असे म्हणत देश वासी आणि भारतीय सैन्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे यामुळे काँग्रेस चा पाठिंबा आहे हे सिद्ध होते.

सेना खेळाडू आणि राजकारणी ही तिन्ही क्षेत्र वेगवेगळी आणि आव्हानात्मक असली तरी सगळ्यात देश सेवा ही समान आहे त्यामुळे माझ्या जीवन यामुळ घडलं असंही ते म्हणाले.
यावेळी खासदार सुरेश अंगडी,विश्वनाथ पाटील,किरण जाधव,राजू टोपन्नावर,उजवला बडवानाचे आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.