Tuesday, April 23, 2024

/

वेध विधान सभेचे भाजपमध्ये इच्छुकांची जत्रा

 belgaum

येत्या विधानसभा निवडणुकीत बेळगाव शहराशी संबंधित भाजपची रणनीती काय असणार असा प्रश्न पडत आहे, सध्या तरी प्रत्येक मतदारसंघात भाजप मधील इच्छुकांची मोठी जत्रा दिसते आहे, ऐनवेळी नेमकी कोण बाजी मारणार हे त्यावेळीच स्पष्ट होऊ शकणार आहे.

बेळगाव ग्रामीण मतदार संघात भाजपचे आमदार संजय पाटील हेच आमदार आहेत, त्यांनी मध्यंतरी मतदार संघ बदलून घेणार अशी अफवा उठवली होती मात्र तो आवाज आता थंडावला आहे, सध्यातरी ग्रामीण साठी संजय पाटील यांचेच नाव आहे, यापलीकडे जाऊन हा एकच मतदार संघ भाजपसाठी कमी इच्छुकांचा ठरला आहे
उत्तर मतदार संघात इच्छुकांची मोठी यादी आहे. अनिल बेनके यांची अध्यक्ष पदावरून उचलबांगडी झाली असली तरी ते अजूनही स्पर्धेत आहेत, आपण समितीच्या संपर्कात आहोत हे उघडपणे जाहीर केले नसले तरी बेनके ते कृतीतून दाखवत असल्याने त्यांची चर्चा आहेच पण त्यांना तिकिट मिळण्याबद्दल शंकाच आहे, स्वतः खासदार सुरेश अंगडी किंवा त्यांची कन्या यांची नावे यादीत अग्रक्रमाने आहेत. याच बरोबर विरेश किवडसन्नवर, डॉ रवी पाटील, राजू टोप्पनावर यांनीही तयारी सुरु केली आहे, किरण जाधव हे जोरदार कामाला लागले असून उत्तरेची उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्नशील आहेत.

भाजपचा मागीलवेळी दक्षिणेत म ए समितीने पाडाव केला. तिथले आमदार अभय पाटील हरले मात्र त्यांचे काम सतत पाच वर्षे सुरु आहे यामुळे ते स्वतः उमेदवारी मिळविण्याच्या तयारीत आहेत, मात्र पडेल उमेदवार म्हणून त्यांचे नाव हटवावे म्हणून भाजपचीच मंडळी जोरात प्रयत्नात आहेत, सध्या बांधकाम व्यावसायिक सुनील चौगुले, शंकरगौडा पाटील, पांडुरंग धोत्रे,डॉ दोडमनी आणि बरेच काही आपापली ताकत लावत आहेत.
जैन लिंगायत मराठा की विणकर असा नवा वाद सुरू आहे. प्रत्येकजण आपण किती मते मिळवू शकतो याचे गणित पक्षश्रेष्टींसमोर मांडू लागला आहे.

 belgaum

खानापूर तालुक्यात मागचे आमदार प्रल्हाद रेमानी पुन्हा बाजी मारून जाण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस मधील मतविभाजन आणि समितीची मते वगळून स्वतःची वोटबँक जमा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. रेमानी बरोबर बाबुराव देसाई आणि,अंजली देसाई आणि धनश्री देसाई या महिला देखील खानापुरातून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत

उत्तरप्रदेश प्रमाणेच कर्नाटक काबीज करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे, त्यात इच्छुक आणि बँडखोऱ्या कमी करण्याचे आव्हान पक्षासमोर आहे उत्तर प्रदेश ची निवडणूक जिंकल्या मूळ कर्नाटक भाजपचा फुगा हवेन भरलाय त्यापेक्षाही किंचित जास्त बेळगावातील दक्षिण, उत्तर ग्रामीण आणि खानापूर भाजप ची हवा जास्त झालीय ते या सर्व विधान मतदार संघातील इच्छुक उममेद वारांच्या संख्येमुळे आपण पाहू शकतो.
जस जशी निवडणूक जवळ येते तशी फुग्यातील हवा किती टिकते का निघून जाते फुग्गा ढब होतो का यावर भाजपच यश अवलंबून आहे

बेळगाव दक्षिण उत्तर आणि ग्रामीण मध्ये अनेक ठिकाणी नवीन जणांना संधी तर आदला बदली होऊ शकते. या तीन पैकी तिन्ही ठिकाणी जातीच्या आधारे उमेदवार दिले जाऊ शकतात यात प्रामुख्याने मराठा जैन आणि लिंगायत असे एकेक असू शकतात ब्राह्मण आणि विणकर समाजातील नाव सुद्धा ऐनवेळी वर येऊ शकतात त्यामुळे भाजप मध्ये अध्याप कुणाचेच तिकीट कन्फर्म नाही इथून पुढं सगळी लॉबिंग होऊ शकते असेही वातावरण आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.