Saturday, February 8, 2025

/

मानवी साखळीद्वारे एकात्मतेसह सलोख्याचा संदेश

 belgaum

बेळगाव लाईव्ह :समाजातील जातीयता, धर्मांधता नष्ट व्हावी. समाजात एकात्मतेसह सलोख्याचे वातावरण निर्माण होऊन स्वराज्याचे सुराज्य व्हावे, यासाठी सर्वपक्षीय सर्व जाती-धर्मांचे नेते व धर्मगुरूंची सभा आज सोमवारी शहरात पार पडली. या निमित्ताने कित्तूर राणी चन्नम्मा चौकात मानवी साखळी करून एकात्मता आणि सलोख्याचा संदेश देण्यात आला.

या संदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी म्हणाले की, जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आज श्रीरामाच्या नावाखाली प्रचाराचा कार्य सुरू आहे. रामायण ही कथा घडली तरी त्यामध्ये श्रीराम श्रेष्ठ होऊ शकत नाही त्या उलट हनुमान श्रेष्ठ होऊ शकतो.

श्रीरामाला आपली पत्नी कोणी पळून नेली हे देखील प्रारंभी कळालं नाही. तिला हनुमानाने शोधून काढले. त्यामुळे हनुमान श्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे महात्मा गांधी त्यांचे सहकारी, सुभाष चंद्र बोस त्यांचे सहकारी, हुतात्मा सुखदेव, भगतसिंग, राजगुरू, बेळगावचा हुतात्मा बाबू काकेरू अशा असंख्य हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले.

मात्र ते स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने अद्यापही जनतेला मिळालेल्या नाही. या स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी नव्याने चळवळ उभारावी लागणार आहे. हा संदेश समाजाला देण्यासाठी तसेच जातीयता नष्ट करावी,

धर्मांधता नष्ट करावी आणि सर्वांनी एक होऊन पुन्हा एकदा खरं स्वातंत्र्य समाजाला मिळवून देण्यासाठी स्वराज्याचे सुराज्य करण्याचा नवा संदेश देण्यासाठी आज आम्ही सर्वपक्षीय सर्व जाती धर्माचा नेत्यांची गुरूंची धर्मगुरूंची सभा झाली.

तसेच सार्वजनिकरित्या येथे राणी चन्नम्मा चौकात मानवी साखळी करून स्वराज्याचे सुराज्य करण्याच्या चळवळीचा संदेश देण्यात आला, असे गुरुवर्य नंदीहळ्ळी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.