Monday, April 29, 2024

/

अंजुम परवेझ यांनी कश्यासाठी दिली बेळगाव भेट

 belgaum

बेळगाव लाईव्ह :पावसाअभावी संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळामुळे परिस्थिती भीषण आपत्तीत बदलू शकते. त्यामुळे महसूल, ग्रामविकास, कृषी यासह सर्व विभागांनी दुष्काळ व्यवस्थापनाबाबत आवश्यक तयारी करावी, अशा सूचना ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्हा प्रभारी सचिव अंजुम परवेझ यांनी दिल्या.

जिल्हा पंचायत सभागृहात शनिवारी आयोजित दुष्काळ व्यवस्थापन व आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. कोणत्याही कारणास्तव पिण्याच्या पाण्याची कमतरता, पशुधनासाठी चार्‍याची कमतरता भासू नये.
शहरी आणि ग्रामीण भागातील नादुरुस्त बोअरवेल तातडीने दुरुस्त कराव्यात. खासगी बोअरवेल ताब्यात घ्याव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या.
ऐन पावसाळ्यात पीक वाया गेलेल्या शेतकर्‍यांनी पर्यायी पेरणीसाठी पेरणीच्या बियाणांची कमतरता भासू नये, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय अभ्यास पथक दुष्काळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी लवकरच जिल्ह्याचा दौरा करणार असून अशावेळी त्यांना दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीबाबत माहिती देता येईल असे क्षेत्र त्यांना दाखवावे.
जिल्ह्यातील काही भागात ओलाव्यामुळे पीक हिरवेगार दिसत असले तरी प्रत्यक्षात पिकाचे नुकसान होऊन उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे या मुद्यावर पुरेसा संवाद झाला पाहिजे, असे ते म्हणाले.
पावसाचा जोर कायम राहिल्यास हिडकल आणि मार्कंडेय जलाशय भरण्याची शक्यता आहे. मलप्रभा जलाशय नेहमीच पूर्ण भरलेला नसतो; मात्र गेल्या वेळी जलाशय भरला होता.

 belgaum

जलाशयातील पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे.
पाटबंधारे नियोजन सल्लागार समिती, प्रादेशिक आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी सर्वसमावेशक चर्चा करून पाणी सोडण्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले.
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे घरे गमावलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई वाटपाची माहिती घेतल्यानंतर ज्यांना नुकसानभरपाईचा पहिला हप्ता मिळाला आहे, त्यांनी घरे बांधली की नाही, याची खातरजमा करावी. बहु-ग्रामीण पेयजल प्रकल्प किंवा कामे कोणत्याही कारणास्तव थांबवू नयेत.
राज्यातील काही भागात पाणी वाटपाच्या समस्येमुळे प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बहुग्राम प्रकल्पांची पुरेशी अंमलबजावणी व्हावी, अशा सूचना त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या.Anjum parvez
शासनाच्या महत्त्वाकांक्षी गृहलक्ष्मी, अन्नभाग्य, गृहज्योती, शक्ती आणि युवानिधी हमी योजनांची पुरेशी अंमलबजावणी झाली पाहिजे. गृहलक्ष्मी योजनेंतर्गत कोणतीही पात्र महिला सुविधेपासून वंचित राहू नये, असे परवेझ यांनी सांगितले.
अंजुम परवेझ यांनी महिला व बालविकास विभागाच्या उपसंचालकांना 65 हजार लोकांची नोंदणी प्रलंबित असल्याने आधार लिंकींग, बँक खाते व इतर तांत्रिक बाबी ज्या नोंदणीमध्ये अडथळा ठरत आहेत त्या तातडीने दूर कराव्यात, अशा सूचना दिल्या.

गृहज्योती योजनेंतर्गत सरासरी प्रमाण निश्चित करण्यात आल्याने ही योजना सुरू झाल्यानंतर विजेच्या वापरात कोणतीही वाढ होणार नसल्याची माहिती हेस्कॉमच्या अधिकार्‍यांनी दिली.
शहरी भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवायची असेल तर अमृत योजनेच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत, असे परवेझ यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पूर्ण झालेले प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरीत करावेत. हा 1 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असून त्यातील बहुतांश कामे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत, अशा सूचना परवेझ यांनी केल्या. दहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये बेळगावला स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे, अशी माहिती स्मार्ट सिटी एमडी सय्यदा आफ्रिन बानू बळ्ळारी यांनी दिली.जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील यांच्यासह प्रांताधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.