Thursday, May 9, 2024

/

बिल्किस बानू प्रकरणी महिलांची ही मागणी

 belgaum

गुजरात येथील बिल्किस बानू प्रकरणातील 11 ही आरोपींची जामीनावर मुक्तता न करता त्यांना पुन्हा कारागृहात डांबून कठोर शासन केले जावे अशी मागणी शहरातील महिला व विविध महिला संघटनांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांकडे करण्यात आली आहे.

गुजरात येथील अन्यायग्रस्त बिल्किस बानू व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी शहरातील महिला व विविध महिला संघटनातर्फे आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्याचप्रमाणे बिल्किस बानू व तिच्या कुटुंबीयांवर अन्याय – अत्याचार करणाऱ्या संबंधित 11 गुन्हेगारांचा जामीन रद्द करावा आणि त्यांना पुन्हा कारागृहात डांबून कठोर शासन केले जावे, अशा आशयाच्या मागणीचे राज्यपालांच्या नावे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहायकांनी निवेदनाचा स्वीकार करून ते त्वरित राज्यपालांकडे धाडण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी सर्वसामान्य महिलांसह विविध महिला संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या बहुसंख्येने उपस्थित होत्या.

निवेदन सादर केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना महिला नेत्या सुशीला म्हणाल्या की, गुजरात येथील बिल्किस बानू व तिच्या कुटुंबीयांवरील अन्याय अत्याचार प्रकरणातील आरोपींना अटक व्हावी यासाठी गेली 20 वर्षे देशभरातील महिलांनी आवाज उठविला.Bilkhis banu

 belgaum

परिणामी 11 जणांना अटक करून कारागृहात डांबण्यात आले होते. मात्र या सर्व गुन्हेगारांना आता जामिनावर मुक्त करण्यात आले आहे. एखाद्या महिलेवर आणि तिची तिच्या कुटुंबीयांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना या पद्धतीने पुन्हा कारागृहाबाहेर मोकाट सोडण्याद्वारे आपण समाजाला कोणता संदेश देत आहोत?

बानू कुटुंबासह महिलांसाठी ही बाब चिंतेची आहे असे सांगून आज महिलांवर वाढते अत्याचार होत आहेत. जर गुन्हेगारांना असे मोकळे सोडण्यात आले तर महिलांनी काय करायचे? कोणाकडे दाद मागायची? यासाठीच जामिनावर मुक्त करण्यात आलेल्या त्या 11 गुन्हेगारांना पुन्हा कारागृहात डांबून कठोर शासन केले जावे अशी आमची मागणी आहे, असे सुशीला यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.