गोवर आणि सौम्या गोवर (एमआर) लसीमुळे बेळगाव जिल्ह्यात तीन बालकांचा बळी गेला आहे. या बालकांचे गेल्या 12 जानेवारी रोजी सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र लसीकरण करण्यात आले होते.
गोवर (मिझल्स) आणि सौम्य गोवर (रूबेला) प्रतिबंधक लसीचे डोस दिल्यामुळे तीन बालकांचा मृत्यू होण्यास आरोग्य कर्मचाऱ्याचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे चौकशी व तपासात स्पष्ट झाले आहे.
- सदर लस सुरक्षित रहावी यासाठी कोल्ड चेन सिस्टिमचा वापर केला जातो. मात्र संबंधित आरोग्य कर्मचाऱ्याने लस फ्रीजमध्ये ठेवण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे बालकांचा मृत्यू झाल्याचे पुनरुत्पादक आणि बाल स्वास्थ्य अधिकारी आय. पी. गडद यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान चौकशीअंती एका सरकारी आरोग्य कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. सध्या हॉस्पिटलमध्ये 18 व 12 महिन्याच्या अशा दोन स्त्री बालकांची प्रकृती सुधारत आहे.
रामदुर्ग (जि. बेळगाव) तालुक्यातील ज्या आरोग्य कर्मचाऱ्याने मुलांचे लसीकरण केले त्याने स्वच्छतेची अथवा निर्जंतुकीकरणाची देखील काळजी घेतली नाही आणि त्याचे पर्यवसान बालकांच्या मृत्यूमध्ये झाले.