Saturday, April 20, 2024

/

इथे हट्टीहोळी, तीकडे जारकिहोळी…… भाजपसाठी आनंदाची होळी

 belgaum

बेळगाव जिल्ह्यातील विधानपरिषदेचा निकाल नवीन समीकरणे जोडून गेला आहे मतदार राजा असतो हे दाखवून देणारा हा निकाल संपूर्ण राज्यात चर्चेचा ठरला आहे.

अनेक संदेश देण्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विधानपरिषदेच्या दोन जागांच्या निवडणुकीत बेळगाव जिल्ह्याच्या मतदाराने दिलेल्या निकालामुळे लोकशाही व्यवस्थेत योग्य निर्णय घेण्याचा अधिकार मतदारांनाच आहे.हे दिसून आले आहे.

मतदारांनी प्रतिष्ठित जारकीहोळी कुटुंबातील चार सदस्यांना एकाच वेळी लोकप्रतिनिधी म्हणून प्रवेश दिला आहे.
रमेश, सतीश , भालचंद्र आणि लखन हे बंधू आता विधानसभा आणि परिषदेच्या पायऱ्यांवर आहेत. तिघांना विधानसभेचे सदस्यत्व आणि लखन यांना विधानपरिषदेत प्रवेश मिळत आहे.
सतीश जारकीहोळी हे देखील सुरुवातीला विधान परिषदसाठी निवडून आले होते, ज्यांनी त्यानंतर विधानसभेत प्रवेश केला .
संपूर्ण देशात बहुधा चार बंधू आमदार म्हणून निवडून येण्याची ही पहिलीच घटना आहे. या निवडणुकीच्या निकालाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

यापूर्वी बहुतांश आमदार आणि खासदार मोदींच्याच जादूने निवडून दिले आहेत. भाजपच्या प्रभावशाली राजकारण्याना सध्याच्या परिषद निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
सतीश जारकीहोळी यांची ताकद आणि संयम आणि बेळगावातील काँग्रेस उमेदवारामागे राजकीय सूत्रधार लक्ष्मी हेब्बालकर यांचे चिकाटीचे प्रयत्न ही प्रमुख कारणे असली तरी जातीचा हिशोब नाकारता येत नाही.
असे असले तरी, परिषदेच्या निकालाने काँग्रेसला नवा जोम मिळाला आहे, हेही खरे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.