Tuesday, April 30, 2024

/

वेळ झाला म्हणून बसविले बाहेर: अन्याय

 belgaum

बसचा अभाव आणि अडचणींचा सामना करीत आयटीआय परीक्षेला जाण्यास परिश्रम घेऊनही काही विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले आहे. या विद्यार्थ्यांना वेळ झाला म्हणून परीक्षेस प्रवेश देण्यात आलेला नसून हा अन्याय असल्याचे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
सय्यदसाब नदाफ हा विद्यार्थी नैसरगी चा रहिवासी आहे.चौराशिमाता आयटीआय कॉलेज , खानापूर येथे तो शिक्षण घेत आहे.सय्यदसाब नदाफ विद्यार्थी सकाळी परीक्षेला येताना उशीर झाला त्यामुळे परीक्षा केंद्रावर घेतले गेले नाही.
असाच प्रकार बस वेळेवर आली नसल्याने विद्यार्थ्यांना मजगांव येथे आयटीआयला यायाला उशीर झाला. एक तास उशीरा झाला म्हणून प्रवेश दिला गेला नाही.परीक्षा केंद्र सरकारी आयटीआय कॉलेज मजगांव येथे विद्यार्थी बाहेर थांबून राहिले होते.
या ठिकाणी आयटीआय परीक्षा आज पासून सुरू झाली असून मागील वर्षी होणाऱ्या परीक्षा कोरोना मुळे रद्द झाल्या आहेत. यंदाच्या वर्षी परीक्षा घेतली जात आहे, मात्र उशीर झालेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला मुकावे लागले आहे. सकाळी 9.30 वाजता ते दुपारी 12 पर्यंत हा परीक्षेचा कालावधी होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.