बेळगावचे जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांची विधान परिषद निवडणुकीच्या पाश्वभूमीवर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी हंगामी जिल्हाधिकारी म्हणून आर वेंकटेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विधान परिषद निवडणुकीची आचार संहिता लागू झाली असून हिरेमठ हे बेळगाव जिल्ह्यातील रहिवाशी त्यामुळे त्यांची बदली झाली असून निवडणुकी नंतर ते पुन्हा रुजू होणार आहेत.
मागील मार्च एप्रिल महिन्यात झालेल्या बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीत देखील त्यांची बदली काही काळा पुरता झाली होती
त्या नंतर ते पुन्हा रुजू झाले होते आता परत विधान परिषदेच्या निमित्ताने त्यांची अन्यत्र बदली झाली आहे.