बेळगाव शहरातील काही बँका आपल्या ग्राहकांना एटीएम कार्ड काढलीच पाहिजेत अशी सक्ती करीत आहेत. ही सक्ती केली जाऊ नये आणि एटीएम कार्ड बंधनकारक करू नये अशी मागणी करण्यात येत आहे. याबद्दल काही ग्राहक जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याच्या तयारीत आहेत.
आर्थिक क्षेत्रात आधुनिकीकरण आले आहे. बँकेत जाऊन रांक लावून पैसे काढण्यापेक्षा सहज आणि पटपट पैसे काढण्यासाठी अनेकजण एटीएम काढून घेतात.
काही ग्राहक तर बँका एटीएम कार्ड देत नाहीत म्हणून तक्रार करतात. पण काही नागरिक आम्हाला एटीएम ची गरज नाही. आम्हाला उशीर झाला तरी चालतो. पण ही सक्ती करू नका अशी विनंती बँकांना करीत आहेत.
प्रत्येक बँक आपल्या कर्मचाऱ्यांना टार्गेट देत असते. प्रत्येक महिन्यात इतक्या ग्राहकांना एटीएम द्या अशी मागणी होते. त्यामुळे बँका सर्व ग्राहकांना एटीएम काढावे अशी सक्ती करतात.पण गोरगरीब माणसांना एटीएम कार्डची सक्ती कितपत योग्य असा प्रश्न निर्माण होत आहे.
एटीएम कार्डसाठी प्रत्येक खातेधारकाला दरवर्षी विशिष्ट शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. त्याचा भुर्दंड नागरिकांना बसतोच तसेच ऑनलाईन फ्रॉड होण्याची शक्यता जास्त असते असे असताना प्रत्येक खातेधारकांना एटीएम काढण्याची सक्ती कशासाठी? अशा प्रतिक्रिया आहेत.
ज्याला गरज आहे तो अर्ज करून एटीएम काढेल.गरज नसणाऱ्यांना सक्ती करू नये या मागणीसाठी आता काही खातेदार आता जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहेत.