Thursday, April 25, 2024

/

खानापूर व बेळगाव तालुक्यातील विजेच्या समस्यांबाबत निवेदन

 belgaum

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडी यांनी संयुक्तरीत्या बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील वीजेसंदर्भातील विविध समस्या दूर करण्याबाबतचे निवेदन आज सोमवारी हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केले.

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीच्या शिष्टमंडळाने सादर केलेले निवेदन स्वीकारून हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथे कायम विजेचा लपंडाव सुरू असतो. त्यामुळे नागरिकांसह विशेषतः शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. तेंव्हा येथील वीज पुरवठा सुरळीत करावा. बिजगर्णी भागात एक सब स्टेशनची निर्मिती केली जावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे खानापूर तालुक्यातील बैलूर हलशी या भागासाठी दोन सबस्टेशन मंजूर झाले आहेत. परंतु अद्याप त्यांची निर्मिती झालेले नाही हे सब स्टेशन लवकरात लवकर सुरू केले जावे.

बैलुर भागात लाईनमनची व्यवस्था करावी. खानापूर तालुका हा कर्नाटकातील सर्वात मोठा तालुका असल्यामुळे या तालुक्यासाठी मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याची सबब सांगितली जाते. तेंव्हा ही समस्या दूर करण्यासाठी बैलुर, हलशी या भागातील स्थानिक आयटीआय किंवा डिप्लोमाधारक बेरोजगार विद्यार्थ्यांना कंत्राटी पद्धतीने सेवेत सामावून घेतले जावे. तसेच कोडगई व इतर जंगल भागात विजेचे खांब कोसळून जवळपास आठवडाभर वीजपुरवठा खंडित झाला होता.Khanapur youth mes

 belgaum

येथील भूमिगत वीज वाहिन्या घालण्याचे काम अर्धवट अवस्थेत पडून आहे. ते काम पूर्ण केल्यास वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडणार नाही. तेंव्हा संबंधित काम लवकरात लवकर पूर्ण केले जावे. निरंतर ज्योती योजनेअंतर्गत वापरले जाणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे असते. तेंव्हा या प्रकाराची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन सादर करतेवेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

युद्धपातळीवर नंदगड तलावाच्या दुरुस्तीची मागणी

पावसाळ्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन नंदगड (ता. खानापूर) येथील तलावाची युद्धपातळीवर डागडुजी केली जावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे.

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे उपरोक्त मागणीचे निवेदन आज सकाळी खानापूर तालुक्याच्या एक्झिक्यूटिव्ह सेक्शन ऑफिसरना सादर करण्यात आले. त्याने निवेदनाचा स्वीकार करून त्वरेने योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले. खानापूर तालुक्यातील नंदगड येथील तलाव लघु पाटबंधारे खात्याच्या अखत्यारीत येतो. या तलावाला तडे गेल्याचे वृत्त नुकतेच वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली असून खानापूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो. त्यामुळे नंदगड येथील तडे गेलेला तलाव धोकादायक ठरू शकतो. सदर तलावाच्या दुरुस्तीसाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असला तरी अद्याप त्याची पूर्तता झाली नाही. तेंव्हा त्याची लवकरात लवकर पूर्तता करून तलावाची युद्धपातळीवर दुरुस्ती केली जावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन सादर करतेवेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.