Saturday, April 20, 2024

/

हालगा-मच्छे बायपासमधील शेतकऱ्यांना पोलीस  संरक्षण द्या

 belgaum

     हलगा मच्छे बायपास प्रकरणी अधिकारी व ठेकेदार शेतकऱ्यांना मानसिक त्रास देत आहेत शेतकऱ्यांना संरक्षण ध्या अशी मागणी शेतकरी संघटनेनं पोलीस आयुक्त त्यागराजन यांच्याकडे केली आहे.

मा.उच्च न्यायालयाचा आदेश तसेच बेळगाव दिवाणी न्यायालयाने हालगा-मच्छे बायपास प्रकरणी  झिरो पॉईंट ग्रहित झाल्याशिवाय बायपासचे कोणतेही काम सूरु करुनये असा निर्वाळा देत दावा सुरु आहे.

पण त्या सर्व आदेशानां हरताळ फासत आताच नवीन रुजू झालेले प्रांताधिकारी, महामार्ग प्राधिकरण खात्याचे मुख्य अधिकारी, तहशिलदार, ठेकेदार मिळून बायपासमधील शेतकऱ्यांना वैयक्तिक भेटून त्यांना भेडसावत आहेत तुमची जमीन बायपाससाठी भूसंपादन केली आहे तेथून काम सूरु करणार असे सांगत मानसिक हनन करताहेत असा आरोप करत शेतकऱ्यांनी पोलिसांकडे संरक्षण देण्याची मागणी  राज्य रयत संघटनेने केली आहे.

शेतकऱ्यांना भेडसावणे हे सर्वस्वी चुकीचे  असून न्यायालयाचा अवमान करण्यासारखे आहे.त्यासाठी पोलीस आयुक्त बेळगाव यांनी वरील अधिकारी,ठेकेदार यांना न्यायालयाचा 0 पॉईंटचा निर्णय होईपर्यंत येथील शेतकऱ्यांना कोणताही मानसिक त्रास देऊ नये

असा आदेश द्यावा त्याचबरोबर बायपासमधील शेतकऱ्यांना सदर अधिकारी,ठेकेदारपासून संरक्षण पूरवावे असे कर्नाटक राज्य रयत संघटना बेळगाव यांच्यवतीने निवेदन देण्यात आले यावेळी प्रकाश नायक,राजू मरवे,महेश चतूर,अनिल अनगोळकर सह इतर शेतकरी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.