Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the td-cloud-library domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/uday/webapps/belgaumlive/wp-includes/functions.php on line 6121
२ मे रोजी मतमोजणी होणारच! परंतु असतील 'हे' नियम - बेळगांव Live
Friday, April 18, 2025

/

२ मे रोजी मतमोजणी होणारच! परंतु असतील ‘हे’ नियम

 belgaum

बहुचर्चित लोकसभा निवडणुकीसाठी बेळगावमध्ये जोरदार रणधुमाळी झाली.या निवडणुकीचे निकाल २ मे रोजी जाहीर होणार असून बेळगावमधील आरपीडी महाविद्यालयात ही प्रक्रिया पार पडणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी नियमावली जाहीर केली आहे.

आरटीपीसीआर कोरोना चाचणी गुरुवार २९ एप्रिल रोजी वडगाव सरकारी आरोग्य केंद्र जेल शाळेनजीक आणि वंटमुरी कॉलनी आरोग्य केंद्र, श्रीनगर साई मंदिर नजीक होणार आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचा येत्या २ मे रोजी निकाल जाहीर होणार असून सकाळी ८ ते दुपारी २ यावेळेत आरपीडी महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे. मतमोजणी केंद्रामध्ये येणाऱ्यांसाठी कोविड-19 चाचणी सक्तीची असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी कळविले आहे.

मतमोजणीदिवशी उमेदवार, अधिकारी, कर्मचारी आणि एजंट्ससाठी कोरोना निगेटिव्ह अहवाल सादर करणे अनिवार्य आहे. कर्नाटक राज्य सरकारने मंगळवारपासून १४ दिवसांचा लाॅकडाऊन आणि नाईट कर्फ्यू जाहीर केला आहे. यामुळे मतमोजणीच्या दिवशी अधिकारी, कर्मचारी आणि एजंटांना वाहन ओळखपत्र देण्यात येईल. मतमोजणी कामांसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पास दाखविल्यानंतर केंद्रात सोडण्यात येईल. नियोजित ठिकाणी वाहन पार्किंग करावे. दरम्यान, निवासी जिल्हाधिकारी योगेश्वर एस. यांनी, मतमोजणीपूर्वी पूर्वतयारी केली जावी. कोविड-19 नियमावलीचे पालन केले जावे. मतमोजणी प्रकिया यशस्वी पार पाडावी, असे आवाहन केले आहे.

मतमोजणी केंद्रावर गर्दी झाल्यास आधीच कोरोना स्थिती गंभीर झालेल्या बेळगावमध्ये स्थिती अजून खराब होऊ शकते. यासाठी प्रशासन कडक अंमलबजावणी करणार असून मतमोजणी केंद्राकडे येणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात येणार आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून कोणालाही मतमोजणी केंद्राकडे येऊ दिले जाणार नसल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे.Satish mangla shubham

निकालाचा दिवस आण‍ि त्यानंतरही विजयी मिरवणुकांवर बंदी घातली आहे. तसेच विजयी उमेदवाराला प्रमाणपत्र घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दोनपेक्षा अधिक जणांना सोबत नेता येणार नाही. मतमोजणी कक्षामध्ये गर्दी व्हायला नको. या ठिकाणी ५० टक्के लोकांचीच उपस्थ‍िती राहील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

मद्रास न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर निवडणूक आयोगाला जाग आली आहे. मतमोजणीनंतर विजयी मिरवणूका काढण्यास आयोगाने बंदी घातली आहे. राजकीय पक्षांनी काढलेल्या जंगी प्रचार सभा, रॅली आण‍ि त्यानिमित्ताने झालेल्या गर्दीमुळे मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगला धारेवर धरले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तुम्हीच जबाबदार असून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले पाहिजे, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने फटकारले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.