Monday, April 29, 2024

/

शिवचरणी नतमस्तक होऊन “यांनी” केला सहजीवनाचा प्रारंभ!

 belgaum

विवाह झाल्यानंतर नवदांम्पत्य हनिमूनसाठी हटके डेस्टिनेशनला प्राधान्य देतात. हिल स्टेशन, बीच अथवा निसर्गरम्य ठिकाणला भेट देतात. या प्रकाराला छेद देत बेळगावच्या दोन नवदांम्पत्य शिवभक्तांनी स्वराज्याची राजधानी रायगड गाठत शिवचरणी नतमस्तक होऊन वैवाहिक जीवनाचा प्रारंभ केला आहे. या आदर्शवत उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कांही दिवसांपूर्वी लग्न झालेल्या माधुरी आणि सागर गुरुनाथ चौगुले (रा. गणेश नगर, सांबरा) तसेच हर्षदा आणि अभिषेक कृष्णा बुद्रुक (रा. बाबले गल्ली, अनगोळ) या शिवभक्त नवदाम्पत्यांनी अनवाणी आणि मराठमोळ्या वेशात रायगड मोहीम पूर्ण केली. विशेष म्हणजे चौघेही उच्च शिक्षित असून आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. सागर व माधुरी हे पुणे येथील टाटा कन्सल्टंन्सी सर्व्हिसमध्ये कार्यरत आहे. अभिषेक सेर्नर हेल्थकेयर आणि हर्षदा इन्कचर टेक्नॉलॉजी या बंगळूरच्या कंपन्यांमध्ये नोकरी करतात.

 belgaum

बेळगावहून निघालेल्या या जोडप्यांनी रायगडाच्या पायथ्याशी असलेले पाचाड गाठले. तेथेच मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वा रायगडाच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होवून त्यांनी गड चढाईला सुरुवात केली. तत्पुर्वी जिजामाताच्या समाधीचे दर्शन घेतले. पारंपरिक मराठमोळा वेश आणि शिवरायांची महती सांगणारी प्रेरणादायी स्फुर्ती गीते गात त्यांनी महादरवाजातून चढाई करत प्रथम त्यांनी राजसभा गाठली. मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला प्रेरणामंत्र म्हणून वंदन केले. होळीच्या माळावरील मूर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर जगदीश्वर मंदिर गाठले. शिवभक्तांचे ऊर्जास्थळ असणाऱ्या छ.शिवरायांच्या समाधीला नतमस्तक होऊन वंदन केले. अखेर माधुरी व सागर गुरुनाथ चौगुले आणि हर्षदा व अभिषेक कृष्णा बुद्रुक या नवदांपत्यांनी ध्येय मंत्राने आपल्या आदर्श उपक्रमाची सांगता केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.