Friday, March 29, 2024

/

ग्रामीण भागातील रस्ते तातडीने दुरुस्त करा-

 belgaum

पहिल्या पावसाच्या दणक्याला खराब झालेले ग्रामीण भागातील रस्ते तातडीने डागडुजी करा अशी मागणी माजी महापौर आणि ए पी एम सी च्या माजी अध्यक्षांनी केली आहे.

सोमवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन पश्चिम भागातील खराब रस्तासंदर्भात चर्चा केली.माजी महापौर शिवाजी सुंठकर आणि ए पी एम सी सदस्य निंगप्पा जाधव यांनी मागणी केली आहे.

बेळगाव तालुक्यातील विशेषतः पश्चिम भागातील अनेक रस्ते खराब झाले आहेत.कर्ले ते बेळवट्टी संपर्क रस्ता तुटण्याच्या मार्गावर आहे अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे झाल्याने झाल्यामुळे ठिकठिकाणी अपघात होत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने उचगाव मेन रोड बेळगुंदी, राकसकोप, बिजगणी, बेळवटी ,बाकनूर, हालगा, तारिहाळ तसेच बागेवाडी, भेंडीगिरी, बडस या संपूर्ण रस्ताची चाळण झाली असुन या संपूर्ण रस्ताची ताबडतोब दुरुस्ती करावी करावी अशी मागणी करण्यात आली.तसेच काही रस्तावर झाडे झुडपे वाढलेली असुन त्याची देखभाल करावी अशी देखील मागणी केली.

 belgaum

संबंधी बांधकाम अभियंता संजीव कुमार यांची भेट घेण्यात आली.यावेळी पुंडलिक पावशे महेश रेडेकर महादेव गौंडवाडकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.