Saturday, April 27, 2024

/

आरोग्य आणीबाणीत जनता भरडत आहे..

 belgaum

कोरोना मुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणीबाणीत जनता भरडत आहे. देशभरातील परिस्थितीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. व्यापार उद्योग थंडावले, आर्थिक उलाढाल आणि रोजगार ठप्प झाले तसेच सेन्सेक्सही कोसळला. अशा वातावरणाने 1971 च्या त्या आणीबाणीची आठवण ताजी होत आहे. ती आणीबाणी लादली गेली होती तर ही सामाजिक आरोग्यासाठी लादावी लागत आहे. पण दोन्ही काळातील समाजजीवन पाहिले तर सर्व गटातील नागरिक अडचणीत हे तत्व कायम आहे.
सध्याची आणीबाणी हे आलेल्या संकटावर संकट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पर्याय शोधून कमीत कमी नागरिक रस्त्यावर दिसतील आणि घरातुन कोणीही बाहेर पडू नये यासाठी ही कर्फ्यु रुपी आणीबाणी घोषित केली आहे. संपूर्ण देश संकटात असल्याने हा मार्ग निवडावाच लागला आहे. यामुळे जनजीवन अडचणीत आले असले तरी त्यामागे संकटातून सोडवणूक हे कारण आहे.

Health emergency
Health emergency

पंतप्रधान इंदिरा गांधी असताना आणीबाणी लादली गेली होती. प्रखर राजकीय विरोधाला दडपून टाकण्यासाठी ते पाऊल उचलण्यात आले होते. त्यावेळी जन संघाच्या नेते व कार्यकर्त्यांना पर्यायाने सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाला अटक करण्यात आली होती. जयप्रकाश नारायण, अटलजी, अडवाणी यासह अनेक नेत्यांना अटक करण्यात आली होती. आणीबाणीच्या विरोधात लिहिणाऱ्या माध्यमांनीही विचार स्वातंत्र्य नव्हते. बेळगाव सह सीमाभागातील लढाई काहीकाळ स्थगित करण्यात आला होता.

सध्या आर्थिक आणीबाणी चे चित्र आहे. जे पैसे खिश्यात आहेत त्यांच्या जोरावर मिळेल त्या साहित्यात घरात पडून राहून घर चालवत राहणे हा एकमेव पर्याय नागरिकांसमोर आहे. जादा पैसे हातात येतील असे वातावरण नाही. रोजच्या मजुरीवर जगणाऱ्यांना वाईट दिवस आलेत. अशा व्यक्तींची उपासमार होऊ नये म्हणून प्रयत्नांची गरज आहे. आरोग्य आणीबाणीत नागरिक उपासमारीने मृत होऊ नयेत ही आता ज्यांच्या खिशात थोडे फार पैसे आहेत त्यांची जबाबदारी असणार आहे.
बेळगावात देखील समाजसेवी संघटनांनी जनतेला गोर गरिबांना कसा त्रास होणार नाही याचा विचार करायला हवा

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.