आज दिवसभर बेळगाव शहरात पावसाने उघडीप दिल्यामुळे आज मार्केट गर्दीने फुलून गेले आहे. अनेक दिवसांनंतर लोक मोकळेपणाने खरेदीसाठी बाहेर पडले. पाऊस पडेल की काय अशी शक्यता असतानाही छत्र्या रेनकोट घेऊन लोक बाहेर पडले पण पाऊस आला नसल्याने त्यांना खरेदी करता आली.दिवाळीच्या तोंडावर बेळगावच्या बाजारपेठेत दरवर्षी खरेदीसाठी गर्दी होते. या गर्दीत बेळगाव शहराबरोबरच इतर भागातील नागरिकही दाखल होतात पण या वर्षी पावसाने बाजारपेठेत निराशा केली होती, आज मात्र पाऊस निघून गेला आणि त्यानंतर बाजारपेठेत गर्दी झाली आहे.
दागिने, कपडे आणि इतर वस्तू खरेदीकडे नागरिकांचा कल आहे, याच बरोबरीने मोबाईल खरेदीवर जास्त भर आहे. कार आणि मोटार सायकल खरेदीकडेही नागरिक वळत आहेत.आज आणि उद्या ही गर्दी जास्त राहील तर पाडव्यालाही गर्दी जास्त होणार आहे. या सणात व्यापार चांगला झाला तरच व्यापारी वर्गाची दिवाळी चांगली होते यामुळे आता पावसाने असेच निघून जावे अशी प्रार्थना करण्यात येत आहे.आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे बाजारपेठेवर विरजण पडले होते. याचा फटका व्यापाराबरोबरच ग्राहकांना बसला होता. अनेकांना बाजारात दाखल होऊन देखील कठीण झाले होते. अशा परिस्थितीत या वर्षीची दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर पडला होता. मात्र शनिवारी पावसाने उघडीप दिल्यामुळे बाजारपेठेत एकच गर्दी झाली होती.
सुवासिक अगरबत्त्या धूप आणि कापूर सारख्या वस्तू बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. दिवाळीला फुलांच्या माळा व धोरणांना मागण्या त्या दरवाज्याला तसेच मोठ्या इमारतीला फुलांच्या माळा व तोरण पहावयास मिळतात. पूजा साहित्याची आणि मालाची खरेदी जोरात सुरू आहे. याबरोबर सलमान काठाच्या या सणांमध्ये विद्युत प्रश्नाला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच इमारती उद्योग-व्यवसाय केंद्रावरच नाही सजलेले असतात. त्यामुळे लाईटच्या वेगवेगळ्या माळाही आणि तसेच दिवेही बाजारपेठेत आकर्षित दाखल झाले आहेत. खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे.
बेळगावातील पांगुळ गल्ली, बापट गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली यासह इतर भागात शनिवारी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. या गर्दीतून नागरिकांना वाट काढताना कसरत करावी लागली. विशेष करून या वर्षी दिवाळी सण साजरा करावा की नाही अशी अवस्था अनेकांच्या मनात आली होती. पावसामुळे अनेकदा यामध्ये भरच घातली होती. तर काहीजण दिवाळी सोपी व शांततेत साजरी करावी असाही द्ध्यास अनेकांनी बांधला होता. मात्र शनिवारी उघडी पडताच बाजारपेठेत मोठी मोठी उलथापालथ झाली.
मागील पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागरिक हैराण झाले होते. त्यामुळे आता दिवाळी पावसातच साजरी करावी लागणार अशी अवस्था होती. मात्र शनिवारी पावसाने उघडीप दिल्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी नागरिकांनी घराबाहेर पडण्यास सुरुवात केली. शनिवारी या गर्दीमध्ये प्रचंड वाढ झाली होती. सायंकाळनंतर गर्दीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून रविवारी ही बाजारपेठेत मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारची गर्दी दिवसभर टिकून होती. वेगवेगळ्या भागातून दाखल झालेल्या महिला वर्गांची संख्या मोठी होती.