Tuesday, April 30, 2024

/

डष्ट आणि खड्ड्यांचे शहर बनलंय बेळगाव

 belgaum

शहरातील रस्त्यावर कडक पडत असलेल्या उन्हात रस्त्यावरील धुळीचे लोट वाहने चालवताना उडत आहेत.  एकीकडे वाहन चालवताना खड्ड्यांचा त्रास तर दुसरीकडे या धुळीचा वाहनचालक, प्रवासी, शालेय विद्यार्थी यांना त्रास होत आहे. यामुळे सर्दी, खोकला, श्वसनाशी संबंधित आजारात वाढ झाली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर धूळमिश्रित वातावरण गेले पाच, सहा दिवस सुरू आहे त्यात डष्ट त्यामुळे बेळगाव हे खड्ड्यांचे धुळीचे शहर बनले आहे.

खड्डे आणि धुळी बाबत महा पालिका अधिकारी आणि रस्त्यावरील डांबरीकरण काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्याना याचे सोयरसुतक नाही.  महापालिका यंत्रणा देखील सुस्तच बनली आहे  यामुळे प्रवासी, वाहनचालकांकडून संताप व्यक्त होत आहे यावर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

गणेशोत्सव अगदी तोंडावर आला असताना  शहरा जवळील महामार्गावरून प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. अशा परिस्थितीत गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला याबाबत नागरिकांकडून उद्रेक होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे. कधीही नागरिक आंदोलन करू शकतात अशीच स्थिती आहे या परिस्थितीत वाहतूक पोलीस यंत्रणा कारवाई करून दंड वसूल करण्यात व्यस्त आहे धुळीच्या त्रासामुळे होणारे आजार व आर्थिक भुर्दंड जनतेला सोसावा लागत आहे. यासाठी आता जनतेलाच पुढे येऊन अधिकाऱ्यांना जाब विचारावा लागणार आहे. वाहनचालकांना करावी लागतेय कसर, रस्त्यावरील धुळीमुळे प्रवासी हैराण होत आहेत. प्रवाशांबरोबरच आजूबाजूची घरे, दुकाने आणि हॉटेल्स यांना सुद्धा हा त्रास सहन करावा लागत आहे. महामार्ग असो किंवा राजमार्ग असो सर्व रस्त्यावरील अवस्था सध्या स्थितीला हीच आहे.

 belgaum

Dust pathholes city

शहराच्या प्रमुख रस्त्यावर खड्ड्यांचा विळखा पडला आहे. या खड्ड्यांतून वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे आणि त्याचबरोबर अपघात होत आहेत. यावर उपाय म्हणून खड्डे भरण्याचे काम विविध संघटनाच्या वतीने सतत चालू आहे.पावसाने विश्रांती घेतल्याने कडक ऊन पडत आहे. त्यामुळे रस्त्यावरील मातीचे रूपांतर धुळीत झाले आहे. अवजड वाहने सतत वेगाने चालू असल्याने रस्त्यावरील धुळीचा डोंब अगदी धुक्यासारखा होत आहे.

या धुळीमुळे समोरचे वाहन सुद्धा दिसत नाही. परंतु या धुळीचा त्रास सर्व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. सर्वात जास्त त्रास दुचाकीस्वारांना होत आहे. तसेच महामार्ग किंवा रस्त्यालगतची घरे, दुकाने आणि हॉटेल्स यांना सुद्धा या धुळीला सामोरे जावे लागत आहे. या धुळीमुळे सर्वांना आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या धुळीचा उपाय गणेशोत्सवापूर्वी करावा अशी  गणेश उत्सव मंडळानी केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.