Monday, April 29, 2024

/

बेळगाव जवळील अपघातात औरंगाबादचे पाच ठार

 belgaum

महामार्गावर भरधाव निघालेल्या कारचा टायर फुटला. त्यामुळे कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावरून दुसऱ्या बाजूला रस्‍त्‍यावर गेली. यावेळी समोरून येणाऱ्या ट्रकची व कारची धडक होऊन कारमधील पाचजण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास बेळगाव जवळील महामार्गावर श्रीनगर गार्डन जवळ हा अपघात घडला.

नंदू पवार वय 28,अमोल निले 26, सुरेश  कन्हेरे वय29, अमोल चावरे  वय 26,महेश चावरे वय 28 सर्वजण रा.औरंगाबाद  अशी मयतांची नावे असून महेश पडळे ,गोपाळ पाटील दोघे गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर  बेळगावातील के एल ई इस्पितळात उपचार सुरू आहेत.ते गोव्याकडे जात होते त्यावेळी हा अपघात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबादहुन कार मधून सात जण  गोव्या कडे निघाले होते. कार श्रीनगर गार्डन जवळ आली तेव्हा समोरील टायर फुटला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ती दुभाजककावरून पलीकडील रस्त्यावर गेली. यावेळी धारवाडहून कोल्हापूरकडे निघालेल्या ट्रकला कारची जोरदार धडक बसली. धडक जबरदस्त असल्याने कारमधील पाच जण जागीच ठार झाले तर दोघेजण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 belgaum

घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त बीएस लोकेश कुमार, वाहतूक व गुन्हे विभागाच्या डीसीपी यशोदा वंटगोडी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बेळगाव वाहतूक उत्तर विभाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.