Thursday, March 28, 2024

/

अरविंद सावंत यांची केंद्रीय मंत्री पदी वर्णी शक्य

 belgaum

गुरुवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मंत्री देखील शपथ घेणार आहेत.2014 ते 2019 या लोकसभेच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात बेळगावच्या मराठी माणसाचा आवाज लोकसभेत उचलणारे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांची कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता असून ते उद्या मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या कोट्यातून शपथ घेणार आहेत.

27 जुलै 2014 रोजी येळ्ळूरचा महाराष्ट्र राज्य फलक हटवल्या नंतर कानडी पोलिसांनी मराठी भाषकांना बेदम मारहाण केली होती त्याचे पडसाद दिल्लीत लोकसभेत उमटले होते दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी बेळगावचा प्रश्न मागील लोकसभेत एक खासदार म्हणून मांडला होता आता तेच अरविंद सावंत मंत्री होत आहेत त्यामुळे भविष्यात बेळगाव प्रश्नी ते लोकसभेत वाचा फोडतील अशी अपेक्षा सीमा वासीयांनी करण्यास काहीच हरकत नाही.

Arvind sawant

 belgaum

अरविंद सावंत नेहमीच बेळगावच्या बाबतीत आक्रमक राहिले आहेत त्यांना सीमा चळवळी ची जाण आहे कोणतेही आंदोलन असले की ते नेहमी संयुक्त महाराष्ट्र बेळगावचा उल्लेख करत असतात त्यामुळे अश्या व्यक्तीची मंत्री पदी नियुक्ती झाल्यास बेळगावचा मराठी माणूस आनंदित असेल.

अरविंद सावंत यांनी मागील वेळेस बेळगावचा प्रश्न मराठी माणसाच्या व्यथा लोकसभेत मांडल्या होत्या त्यावेळी हुबळीचे खासदार प्रहलाद जोशी बेळगाव चे सुरेश अंगडी यांनी सावंत यांना विरोध केला होता त्या आठवणी पुन्हा एकदा जागे झाल्या आहेत.केंद्रीय मंत्री झाल्यावर अरविंद सावंत यांनी केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या शिफारसी त्यांची अंमलबजावणी करण्यास प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ऐन निवडणुकीत गेल्या 1 मे 2019 महाराष्ट्र दिनाच्या अगोदर रात्री 12 वाजता मुंबई येथील हुतात्मा स्मारका समोर संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांना अभिवादन करत बेळगाव च्या घोषणा दिल्या होत्या पहा खालील लिंक मध्ये तो व्हीडिओ

मध्यरात्री १२ वा. 'बेळगाव,निपाणी,भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' घोषणा देऊन चळवळीत हुतात्मा झालेल्या शहिदांना…

Posted by Arvind Sawant on Wednesday, May 1, 2019

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.