Wednesday, April 24, 2024

/

कन्नड फलकांची सक्ती ही अधिकारांची गळचेपीच

 belgaum
बेळगावचे जिल्हाधिकारी एस झियाउल्ला यांनी नुकताच सर्व फलकांचे कानडीकरण करण्याचा फतवा काढला, यावर आवाज उठवणारे एक निवेदन मध्यवर्ती म ए समितीच्यावतीने त्यांनाच देऊन  ही सक्ती म्हणजे अधिकारांची गळचेपीच आहे, अशी भावना मांडण्यात आली.
मध्यवर्ती चे अध्यक्ष दीपक दळवी, प्रकाश मरगाळे, मनोहर किणेकर, विकास कलघटगी आणि मालोजी अष्टेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
भाषिक अल्पसंख्याक म्हणून असलेल्या हक्कांवर ही गदा ठरते, आपण सूचना केल्यावरून मनपा आदेश काढत आहे. हा प्रकार चुकीचा आहे. ही मराठी माणसाची छळवणूक आहे, तेंव्हा हा प्रकार थांबवावा,अन्यथा याविरुद्ध रस्त्यावर उतरावे लागेल, त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास ती जबाबदारी पूर्णपणे तुमची असेल असे ठासून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.