Monday, April 29, 2024

/

कपिलेश्वर उड्डाणपुलाच्या वर्षापूर्तीचे फायदे कमी तोटेच जास्त

 belgaum

मध्यवर्ती भागातील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला कपिलेश्वर उड्डाण पुल मागील वर्षी तयार होऊन आज एक वर्ष पूर्ण झाले.अत्यंत निकृष्ट बांधकामाचा नमुना म्हणून ह्या पुलाकडे सध्या बघितले जात आहे.शहरातील मुख्य जोडरस्ता असणाऱ्या ह्या मार्गावर तूफान अशी वर्दळ असते.आणि म्हणूनच प्रशासनाने येथे स्थानिकांचा विरोध असून सुद्दा आपल्या अट्टाहासापायी उड्डाण पुलाची निर्मिती केली पण त्यामुळे तेथून प्रवास करणाऱ्याचे प्रश्न मार्गी लागले काय अस विचार केला तर मुळीच नाही अस म्हणावे लागेल.शनी मंदिर जवळ रोजची होणारी वाहनांची तुडुंब गर्दी ह्या प्रशासनाला चपराकच म्हणावी लागेल.त्याच बरोबर स्थानिकांना रहदारीमुळे निर्माण होणाऱ्या धुराचा सुद्दा सामना करावा लागत आहे.त्यामुळे हा उड्डाणपुल बेळगावकराना कूचकामी ठरला आहेROBस्मार्टसिटी मध्ये बेळगाव शहराची निवड झाल्यानंतर मध्यवर्ती भागात असलेल्या ह्या उड्डाणपुलाखाली राहाणाऱ्या स्थानिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या की आता पुलाच्या बाजूने सर्व्हिस रस्ता बनणार त्याच बरोबर वेळेत कचरा उचल होणार.व्यापारात वाढ होणार पण ह्या सगळ्या अपेक्षा धूळीस मिळाल्या आहेत असेच म्हणावे लागेल.हनुमान नगर सारख्या भागात वर्षातून तीन तीन वेळा रस्ता होत असताना मध्यवर्ती मराठी भागावर प्रशासनाचे दुर्लक्ष का ?असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

बातमी सौजन्य-विजय होनगेकर

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.