Friday, April 26, 2024

/

शिधापत्रिकाधारकांना यापुढे दरडोई 6 किलो तांदूळ

 belgaum

कोरोनाचे संकट टळले असल्याने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना दरडोई मिळणारा अतिरिक्त 5 किलो तांदूळ या महिन्यापासून बंद झाला आहे. त्यामुळे येत्या फेब्रुवारीपासून प्रतिडोई 6 किलो तांदूळ वितरित केला जाणार आहे.

कोरोनाच्या संकटामुळे नागरिकांना धान्य कमी पडू नये यासाठी 2019 पासून केंद्र सरकारकडून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रतिडोई अतिरिक्त 5 किलो तांदूळ दिला जात होता. आता कोरोनाचे संकट टळले असल्यामुळे या महिन्यापासून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मिळणारा हा तांदूळ बंद झाला आहे.

परिणामी या महिन्यापासून केंद्र सरकारकडून केवळ 5 किलो तांदूळ पुरविला जाणार आहे. त्याचप्रमाणे पुढील महिन्यापासून राज्य सरकारकडून 1 किलो तांदूळ वितरित केला जाईल.

 belgaum

या पद्धतीने पुढील फेब्रुवारी महिन्यापासून शिधापत्रिका धारकांना प्रतिडोई 6 किलो तांदूळ वितरित केला जाणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.