Saturday, April 20, 2024

/

महांतेश कवटगीमठ यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सर्व मिळून काम करू: येडियुरप्पा 

 belgaum

भाजप नेत्यांनी रविवारी चिक्कोडी आणि बेळगावी येथे जन स्वराज्य यात्रेचा भाग म्हणून रॅली काढल्या, विधान परिषद निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार महांतेश कवटगीमठ यांचा प्रचार हाच मुख्य उद्देश होता.माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी या दोन्ही रॅलींना संबोधित केले.

मेळाव्यात पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांची भाषणे झाली. जारकीहोळी बंधू रमेश आणि भालचंद्र यांची अनुपस्थिती त्यांचे धाकटे बंधू लखन जारकीहोळी यांच्याबद्दल भाजपने दाखविलेल्या अनास्थेबद्दलचे चित्र दाखवून गेली.

भालचंद्र जारकीहोळी यांनी आपल्या भावासाठी उघडपणे पक्षाचे तिकीट मागितले, तर रमेश जारकीहोळी यांनी अशी कोणतीही मागणी केली नसल्याचे सांगितले आहे.
याबाबत विचारले असता येडियुरप्पा म्हणाले की, ते जारकीहोळी बंधूंशी बोलणार आहेत. “महांतेश कवटगीमठचा विजय निश्चित करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र काम करू,” असे त्यांनी बेळगावात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ, मंत्री उमेश कत्ती, शशिकला जोल्ले यांच्यासह जिल्ह्यातील इतर ज्येष्ठ नेतेही अनुपस्थित होते. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, पक्षाने त्यांना प्रचाराशी संबंधित कामासाठी इतर मतदारसंघ दिले होते.त्यामुळे ते येऊ शकले नाहीत.

चिक्कोडी येथे, येडियुरप्पा म्हणाले की, भाजप हा जातीवर आधारित भेदभाव मानणारा पक्ष नाही. “आम्ही सर्व समुदायांना समान महत्त्व देतो. पक्षात सर्व समाजातील नेते महत्त्वाच्या पदांवर आहेत. समाजातील सर्व घटकांचा समान विकास आणि सर्वांमध्ये सामंजस्य हे आमचे ध्येय आहे,’’
ते म्हणाले की, देशभरात काँग्रेसचा पराभव होत आहे, तर भाजप सर्व राज्यांमध्ये ताकदीने पुढे जात आहे. “काही दिवसांत काँग्रेसचा पूर्ण पराभव होईल. ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वच पातळ्यांवर लोकांनी ते नाकारले आहे.”
बेळगाव येथे, बोलताना येडियुरप्पा म्हणाले की मतमोजणीच्या पहिल्या फेरीत श्री कवटगीमठ विजयी होतील कारण त्यांना सर्वात प्रथम पसंतीची मते मिळण्याची शक्यता आहे.

” कवटगीमठ यांनी विधानसभेच्या कामकाजात भाग घेतला आहे आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित समस्या मांडल्या आहेत. जिल्ह्यातही त्यांनी उत्साहाने काम केले आहे,’’ असे ते म्हणाले. राज्यभरातील पक्षाच्या उमेदवारांना अभूतपूर्व पाठिंबा मिळत असल्याचे ते म्हणाले.
पक्षाचे नेते बी. श्रीरामुलू , लक्ष्मण सवदी, वीरन्ना काडाडी( राज्यसभा सदस्य), खासदार मंगला अंगडी आणि अण्णासाहेब जोल्ले, एन. रविकुमार, पी. राजीव, अनिल बेनके, महादेवप्पा यादव, महांतेश यादव, दोडगौडर,इतर आमदार आदी रॅलीत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.