Saturday, May 4, 2024

/

बेळगावकर म्हणतात चंदू पाटील पडलेचं पाहिजेत

 belgaum

काही माणसं मुर्दाड असतात,काही माणसे गेंड्याच्या कातडीची असतात. काही धूर्त असतात तर काही बनेल असतात.अश्या विविध रसायनाची विविध माणसं आपल्या आजूबाजूला वावरत असतात. याहूनही काहींची तऱ्हा वेगळी असू शकते.असतेही.कोल्हापूरचे मंत्री चंद्रकांत पाटील ही त्यातलेच. पुण्याचे पालकमंत्री .माणूस मोठा बेरकी,चेहऱ्यावर नेहमी लुब्रा भाव,डोक्यावरची केसं तेलात पिचपीचीत करून चप्प बसवलेली,ओठाचा चंबु करून ,मराठ्यांचा असूनही ब्राह्मणी भाषेत बोलणारा ‘चंदू’.

चंद्रकांत पाटील उर्फ दादा महाराष्ट्रात दादांची परंपरा थोर आहे .वसंतदादा,दादा कोंडके असे अनेक दादा झालेत, त्यांचा महाराष्ट्राला गर्वही आहे.पण या चंद्रकांत पाटलाचा महाराष्ट्राला उग्र दर्प येऊ लागला आहे.शरद पवारानाहीं माझ्या चाली कळत नाहीत,अशी वल्गना करत हे चंद्रकांत दादा स्वतःला बिलंदर समजू लागले आहेत.

पुणेकरांचे जावई असलेले चंद्रकांत पाटील ,स्वतःचे कोल्हापूर सोडून भाजपसाठी सुरक्षित असलेल्या मतदारसंघातुन निवडणूक लढवीत आहेत .त्यात कोथरूडचा विद्यमान आमदार मेघा ताईंचा बळी गेला. त्यांचं कामही कोथरूड मतदारसंघात लक्षणीय आहे.दादांची नजर अश्या आयत्या ताटावर पडली व दादा पाटावर जाऊन बसले.ज्याला आपल्या गावांत किंमत नसते तो सासुरवाडीत अगत्य झोडायला जातो असे म्हणतात पण कोथरूड करांनी या ‘ दाजींचे’ लाडही काही पुरविलेले दिसत नाहीत. कोल्हापूरच्या मूर्तीपूजकांना दादांनी विरोध केला होता .याचा संदर्भ घेत पुण्याच्या ब्राह्मण महा संघांनी ‘ब्राह्मणांना विरोध करणारा’ उमेदवारच नको अशी हाकाटी उठवली.त्यातील काही जणांच्या मुठी गरम करून चंपानी हा विरोध कमी करण्याचा प्रयत्न केला परंतु तो तितकासा सफल झाला असे म्हणता येणार नाही.कोथरूडचे ब्राह्मण म्हणतात ‘आमचं ठरलंय’ .ब्राह्मण संघांचं वादळ सुरू असतानाच कोथरुडात नाक्या नाक्यावर बोर्ड दिसायला लागले ‘आमदारकीचा उमेदवार स्थानिक असावा… पुरात वाहून आलेला नसावा’ परत चंदू पाटलांची धावाधाव चालू झाली पाटलांची भाडोत्री माणसे कामाला लागली. विरोधच नसल्याची टिमकी वाजवायला लागली.

 belgaum

आयुष्यभर जो माणूस आपल्या जातीच्या विरोधात,गावाच्या विरोधात,भाषेच्या विरोधात वागला त्याला इतर गावात स्वीकारतील?

सीमावर्ती भागाचे समन्वयक म्हणून चंद्रकांत पाटलांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाने केली. त्यानंतर चंपानी बेळगावात एकदाही पाय ठेवला नाही,गोकाक मध्ये कन्नड गीत गाऊन मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम मात्र चोखपणे केले.शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात चंद्रकांत पाटलांची बी टीम उभा करून, शिवसेनेला देखील टांग देण्याचा त्यांनी प्रयत्न चालवलेला आहे. ज्या शिवसेनेने बेळगाव सीमा प्रश्नासाठी 69हुतात्मे दिले, त्यांच्या विरुद्ध चंद्रकांत पाटलांचे कारनामे’ बघून बेळगावातील मराठी माणसाचे आतडे पिळवटल्याशिवाय रहात नाही.शिवसेना स्वतंत्र बाण्याची संघटना भाजपने त्यांच्या अस्तित्वावरच गंडांतर आणण्याची योजना पद्धतशीरपणे आखली आहे.निकालाच्या नंतर हे चित्र व्यवस्थित स्पष्ट होईल .

मराठी माणसाचा घात करणारा ‘घातकी’चंदू पाटील पडलाच पाहिजे.अशी बेळगावकर मराठी जनतेची भावना आहे.कोथरूड कर सुज्ञ आहेत त्यांना माणसाची चांगली पारख आहे. ज्याला कोल्हापूरने नाकारले त्याला पोसायला ते रिकामी नाहीत.या ‘तेल्या मारुतीची’ स्थापना कोथरुडाच्या बाहेर करतील यात तिळमात्र शंकानाही म्हणून चंदू पाटील ‘पडलाच’ पाहिजे!!!

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.