Monday, April 29, 2024

/

अन्यायकारक वीजदरवाढ मागे घ्या- युवा समितीची हेस्कॉमकडे मागणी

 belgaum

खानापूर : राज्य सरकारने लागू केलेले अन्याय कारक वीजदरवाढ तत्काळ मागे घेण्यात यावी. तसेच बैलुर परिसरात सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा, कायमस्वरूपी लाईनमनची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने हेस्कॉम अधिकाऱ्यांकडे केली.

गुरुवारी दिलेल्या निवेदनात, बैलूर परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. याचा फटका शेतकरी आणि उद्योजकांना बसत आहे. या गावांसाठी कायमस्वरूपी लाईनमन नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

तरी या निवेदकाची दखल घेऊन बैलूर परिसरात वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा आणि कायमस्वरूपी लाईनमनची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.

 belgaum

राज्य सरकारने प्रति युनिट मागे 30 पैसे दरवाढ केली आहे. ही दरवाढ अन्यायकारक असून सामान्य जनता आणि शेतकरी या महागाईत होरपळून जाणार आहेत. त्यामुळे तत्काळ दरवाढ मागे घेण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

समिती अध्यक्ष धनंजय पाटील यांनी हेस्कॉमचे उपमुख्य कार्यकारी अभियंता नमित ईजारी यांना निवेदन दिले. यावेळी सचिव सदानंद पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील, उपाध्यक्ष पिंटू नावलकर, विनायक सावंत, बैलूर ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल नाकाडी, दामोदर नाकाडी, भुपाल पाटील ज्ञानेश्वर सनदी, किशोर हेब्बाळकर, मल्लाप्पा पाटील आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.