येळ्ळूर जिल्हा पंचायत मतदार संघात पिण्याच्या पाण्याची प्रलंबित असलेली बहू ग्राम पाणी योजना मार्गी लावा अशी मागणी जिल्हा पंचायत आरोग्य शिक्षण स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल यांनी केली आहे.शनिवारी जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या के डी पी बैठकीत त्यांनी वरील मागणी केली आहे.
येळ्ळूर मच्छे धामणे आणि पिरनवाडी या चार ग्राम पंचायतीसाठी ही पाणी योजना असून तीन वर्षा पूर्वी 110 कोटी माजी आमदार संभाजी पाटील यांच्या काळात मंजुर झाली होती ती का थांबली आहे असा प्रश्न त्यांनी केला. सदर योजना कोणत्याटप्प्यावर रेंगाळली आहे याची चौकशी करा अश्या सूचनामंत्री सतीश जारकीहोळी आणि जिल्हाधिकारी बोमनहळळी यांनी केली. येळ्ळूर भागात टँकरनी पाणी पुरवठा करून सी आर एफ निधीतून तुर्तास चार बोरवेल मारा व्यवस्था करा अशीही मागणी गोरल यांनी केली.
चारा पाणी पुरवठा करा:डी सी यांच्या तहसिलदारांना सुचना
उन्हाळ्यात बेळगाव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागात पिण्यासाठी पाणी आणि जनावरांना चारा पुरवठा करा अश्या सूचना जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदाराना दिल्या आहेत.आमदारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डी सी यांनी वरील सूचना दिल्या आहेत.
पिण्याचे पाणी आणि चाऱ्यासाठी तहसिलदारानी पुढाकार घ्यावा यासाठी प्रत्येक तहसिलदाराना 50 लाख रुपये देण्यात आले आहेत प्रांताधिकऱ्यानी सभा घ्याव्यात असे ते म्हणाले.रायबाग अथणी चिकोडी भागातआता पासूनच तीव्र पाणी टंचाई भासत असून टँकर येत नाहीत बोअर वेल काढण्याची गरज आहे अशी मागणी अथणीचे आमदार महेश कुमटहळळी यांनी केली.बैठकीत वन मंत्री सतीश जारकीहोळी, आमदार उमेश कत्ती,पी राजीव,आनंद मामनी लक्ष्मी हेब्बाळकर,जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे, उपाध्यक्ष अरुण कटांबळेआदी उपस्थित होते.
उगार साखर कारखान्याचे दूषित पाणी कृष्णा नदीत मिश्रित होत आहे त्यामुळं कृष्णेच पाणी दूषित बनलं आहे याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने दुर्लक्ष केलं असून जिल्हा प्रशासनाने याची चौकशी करावी अशी मागणी कुडचीचे आमदार पी राजीव यांनी केली. दूषित पाण्याने कृष्णा नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडले आहे असं देखील राजीव म्हणाले यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा बाजी करणाऱ्या अशोक पट्टण समर्थकावर कारवाई करा अशी मागणी आमदार महादेवप्पा यादवाड यांनी केली.