Sunday, June 23, 2024

/

शेतकरी चळवळीतील रणरागिणीची एक्झिट

 belgaum

बेळगाव लाईव्ह:कर्नाटकातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निश्वार्थपणे अहोरात्र झटणाऱ्या शेतकरी नेत्या जयश्री गुरण्णवर यांचे बुधवारी 22 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे. या निधनाने समस्त शेतकरी बंधू तसेच हालगा-मच्छे बायपासमधील सर्व शेतकरी बंधूवर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

उद्या गुरुवार दिं 23 रोजी दुपारी हिंडलगा सुळगा येथे अंत्यविधी होणार आहे. त्याआधी सकाळी 9.30 वाजता सम्राट अशोक चौक, किल्ला तलाव जवळून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यामधे बायपासमधील सर्व शेतकरी बंधूनीं मोठ्या संखेने अंत्ययात्रेत सहभागी व्हावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

बेळगाव तालुक्यातील हलगा मच्छे बायपासच्या लढ्यामध्ये देखील त्या सक्रिय होत्या. बायपासच्या जमीन संपादना विरोधात झालेल्या आंदोलनात त्यांनी अनेकदा सहभाग नोंदवून प्रशासनाला जाब विचारला होता. बायपास चा लढा सुरू असताना लढा अर्धवट सोडून निघून गेल्याने शेतकऱ्यांना अतिव दुःख झाले आहे.

 belgaum

त्यांची शेतकऱ्यांच्या विषयी तळमळ भरपूर होती. बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यासाठी लढणारी रणरागिणी म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. अशा शब्दात शेतकरी नेते राजू मरवे यांनी त्यांना श्रद्धांजली व्यक्त केली आहे.Jayshree

गुरुवारी 23 मे रोजी दुपारी हिंडलगा सुळगा येथील स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असून सकाळी साडेनऊ वाजता किल्ला येथील सम्राट अशोक चौकातून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. यावेळी सर्व शेतकरी बंधूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.Samarth

शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर असो किंवा कोणत्याही आंदोलन असो, हलगा बायपासचे जमीन संपादन विरोधात असो किंवा शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलाचा दरवाढीचा प्रश्न असो शेतकऱ्यावर अन्याय झालेल्या कोणत्याही प्रश्नात त्या नेहमी अग्रभागी असायच्या आणि प्रशासनाला जाब विचारायच्या, त्यांच्या आंदोलनाने चक्क कर्नाटक राज्यातील अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले जायचे. अशा या महिला नेत्याला बेळगाव लाईव्हने देखील अनेकदा कव्हर केले आहे.

शेतकरी चळवळीतील सक्रिय महिला कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे बघितले जायचे. नेहमीच शेतकऱ्यांचा आवाज म्हणून जिल्हा प्रशासनात आणि राज्यभरात चर्चेत असलेल्या जयश्री यांच्या जाण्याने नक्कीच शेतकऱ्यांचा आवाज हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.