Tuesday, February 11, 2025

/

बेळगावात पालक मंत्र्यांनी घेतली दुष्काळ व्यवस्थापन बैठक

 belgaum

बेळगाव लाईव्ह :यंदा पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता असून ज्या ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होईल तेथे तातडीने टँकरने पाणीपुरवठा करावा.

तसेच जिल्ह्यातील प्रत्येक पंचायतीने स्वत:चा पाण्याचा टँकर खरेदी करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिल्या.

बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे आज शुक्रवारी सकाळी दुष्काळ व्यवस्थापनासंदर्भात पार पडलेल्या लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. कांही वर्षांपूर्वी प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतःचा टँकर असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे यावेळी प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या कडील टँकरची माहिती उपलब्ध करून द्यावी.Meeting drought

त्याचप्रमाणे पाणी टंचाई असतानाही टँकर खरेदी न केल्यास संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत टास्क फोर्सच्या बैठका घेऊन योग्य आराखडा तयार करण्यात यावा, असे आदेश मंत्री जारकीहोळी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

यंदा पावसाळ्यासह हिवाळ्यात पाऊस नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे पीक नुकसानभरपाई व चारा पुरवठ्याबाबत त्वरेने कार्यवाही केली जावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.