Friday, June 21, 2024

/

पाणीपुरवठा खात्याच्या दिव्याखालचा अंधार

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सध्या पावसाचे मान कमी झाल्याने पाण्याची ओढ सर्वत्र जाणवत असतानाच प्रशासकीय पातळीवर मात्र डुलक्या घेण्याचं काम निरंतर चालूच आहे असंच म्हणावं लागेल कारण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

कुठे रस्त्याच्या खुदाईच्या कामामुळे तर कुठे पाईप फुटणे तर कुठे पाणी गळती यामुळे पाणी वाया जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात चालूच आहे.

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उप नोंदणी कार्यालयाच्या समोर पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे त्यामुळे उप नोंदणी कार्यालयाला येणाऱ्या किंवा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ये जा करणाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.Water leakage

 belgaum

पुढे पाणी कपात करण्यापेक्षा आजच जर पाण्याचे नियोजन केले तर पुढे येणाऱ्या दुष्काळी संकटाला तोंड देणे नागरिक आणि प्रशासनाला सुलभ जाणार आहे याचा विचार प्रशासनाने आणि पाणीपुरवठा करणाऱ्या एल अँड टी कंपनीने करणे गरजेचे बनले आहे.

त्याच त्याचबरोबर पाणी बचत करा आणि पाणी वाचवा देश वाचवा असा संदेश देणाऱ्या जाहिरातीवर लाखो रुपये खर्च करणाऱ्या प्रशासनाला स्वतःच्या दिव्याखालचा अंधार दिसत नाही का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.