Thursday, April 25, 2024

/

महिलांनो लष्करात जाण्यासाठी काय काय कराल?

 belgaum

लष्कर हे असं क्षेत्र आहे ज्यात पूर्वी पुरुषांचा पगडा होता. पण तुम्हा सर्वांना माहितीच आहे की आझाद हिंद सेनेत मोठ्या प्रमाणात महिला सामील झाल्या होत्या. नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांना महिलांचं महत्व कळलं होतं. स्वा. सावरकरांच्या कल्पनेतली स्त्री सुद्धा अशीच खंबीर नि निडर होती. त्यांच्या नाटकात व कादंबरींमध्ये सुद्धा स्त्रीचं असंच धाडसी चित्र रंगवलेलं आहे.

आपल्या भारतातल्या देवी रणरागिणी आहेत. शृंगार हा स्त्रिचा दागिना असला तरी स्त्री ही शक्ती आहे हे आपण कधीच विसरलेलो नाही.
आजवर सैनिक म्हणजे पुरूष असं समीकरण रूढ होतं. किंबहुना नेवी असो, आर्मी असो किंवा एअरफ़ोर्स असो, तिथे पुरूषांचीच मक्तेदारी होती. आता मात्र ह्या समजाला स्त्रियांनी छेद देण्यास सुरूवात केली आहे. मोठ्या प्रमाणात स्त्रिया आर्मीत भरती होत आहेत.

तरीही जर आपण आकडेवारी पाहिली तर आपल्या सैन्यात स्त्रियांचं प्रमाण अजुनही खूप कमी आहे. ह्याचं एक कारण असं की आर्मीत भरती होण्यासाठी काय करावं लागतं ह्याची माहिती मुलींना नसते. पूर्वी लष्करात स्त्रियांची भरती दोन शाखात केली जायची. आता अजून त्यांच्यासाठी आठ शाखा वाढवण्यात आल्या आहेत. ज्यात त्या परमनंट कमिशन घेऊ शकतात. ज्यात त्या इमेज इंटरप्रिटर, लॅंग्वेज स्पेशालिस्ट किंवा सर्विस बोर्डावर काम करू शकतात.

 belgaum

लष्करात भरती झाल्याने चांगला पगार तर मिळतोच. पण प्रतिष्ठाही मिळते. समाजात सैन्याला पुष्कळ मान सन्मान आहे. कारण सैनिक आपल्या देशाचं रक्षण करतात. त्यांच्यामुळे आपण दिवाळी साजरी करु शकतो. आता लष्कराने अजून गैर लढाऊ शाखांसाठी मुलींची भरती करता यावी अशी शिफ़ारस केली आहे ज्यात त्या सायबर स्पेशालिस्ट, कायदेविषयक, अकाउंट्समध्ये किंवा शैक्षणिक विभागात काम करू शकतील. गेल्या वर्षी कोर्टाने महिला कमांडर म्हणून काम करू शकतील असा निर्वाळा दिला.
आता ज्या महिला आधीच शॉर्ट सर्विस कमिशन अंतर्गत आर्मीत सेवा करतायत त्या ४ वर्ष पूर्ण झाल्यानंतर परमनंट कमिशनची निवड करू शकतात.

women army rally belgaum
तर महिलांनो, तुम्हाला लष्करात भरती व्हायचं असेल तर पदवी खूप महत्वाची आहे. ग्रॅज्युएट झालेल्या मुली लष्करात भरती होण्यासाठी अर्ज करू शकतात. सध्या ज्या मुली शॉर्ट सर्विस कमिशनसाठी पात्र ठरल्या आहेत त्या १४ वर्षं लष्करात काम करू शकतात. ह्यासाठी लेखी परीक्षा द्यावी लागते. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर इंटरव्ह्यु म्हणजे तोंडी मुलाखत घेतली जाते. लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यु ह्या दोघांचे गूण लक्षात घेऊन मग ऑफ़िसर्स ट्रेनिंग अकॅडमीसाठी ती पात्र ठरवली जाते. म्हणजेच युनियन पब्लिक सर्विस कमिशनची परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. त्यासाठी ज्या मुलीचे वय एकोणीस ते पंचवीस वर्षांपर्यंत असेल ती ही परीक्षा देऊ शकते. मग ह्या परीक्षेनंतर सर्विस सिलेक्षन बोर्डातर्फ़े मुलाखत घेतली जाते. सहा महिन्यातून एकदा, १२ मुली ट्रेनिंगसाठी निवडल्या जातात. ज्या मुली ह्यासाठी पात्र ठरतात त्यांना ४९ महिने अतिशय खडतर प्रशिक्षण द्यावं लागतं.

Army women police
भारतात स्त्रियांना लढाऊ श्रेणीत प्रवेश मिळत नाही त्याबद्दल अजुनही विचार मंथन चालू आहे. कदाचित येत्या काळात परदेशात दिलं जातं तसा महिलांनाही त्या श्रेणीत पद मिळू शकेल. मात्र एनएसजी जे लष्कराचा भाग नाही त्यात महिलांना प्रवेश मिळू शकतो, आणि त्यासाठी त्यांना ९० दिवसांचं अतिशय खडतर प्रशिक्षण घ्यावं लागतं. भारतात पुनीता अरोरा ह्या पहिल्या महिल्या होत्या ज्यांची इंडीयन आर्मीत निवड झाली होती.

काही मुलींना एनसीसी केल्यामुळे थेट प्रवेश मिळू शकतो. म्हणजेच त्यांना लेखी परीक्षा द्यावी लागत नाही. अर्थात त्यासाठी अविवाहीत असणं, १९ ते २५ ह्या वयोगटात असणं, आणि एनसीसीमध्ये बी ग्रेडचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. आणि पदवी परीक्षेत कमीत कमी पन्नास टक्के गूण मिळवून उत्तीर्ण होण्याची अट आहे. ह्यांचाही प्रशिक्षण काळ ४९ महिन्यांचा असतो. तसंच एसएससी टेक एन्ट्री देखील महिलांना मिळू शकते. ह्यात लेखी परीक्षेची गरज नसते.
तर महिलांनो, तुम्ही या करिअरचा गांभिर्याने विचार केला पाहिजे. धाडसी महिलांसाठी लष्कर हे क्षेत्र अतिशय योग्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.