कडोली ग्राम पंचायत चा कारभार चव्हाट्यावर नागरिकांतून संताप पोलिसांची दांडगाई
कडोली येथे राबविण्यात येत असलेले मास्टर प्लॅन आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. आपला मनमानी कारभार करत ग्राम पंचायतमधील काहींनी वनमंत्र्याना हाताशी धरून धमकी दाखविण्यात येत असल्याची तक्रार ताजी असतानाच आता विरोध करणार्यांना पोलिसांनी धाक दाखवून आपला मनसुबा पूर्ण करून घेण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.
ज्यांनी विरोध केला आहे त्यांना 5 मार्च रोजी नोटिसा पाठविण्यात आल्या असून 6 रोजी तुमची घरे खाली करा असा आदेश देण्यात आला आहे त्यामुळे या अजब कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. या मास्टर प्लॅनच्या अट्टाहास कशासाठी करण्यात येत आहे हे अजूनही समजत नसल्याचे सांगितले जाते 2 कोटीतर वाया जाणार नाहीत ना की कमिशन मिळणार नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे
शुक्रवारी पोलिसांच्या उपस्थितीत घरे व इतर साहित्य हटविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. गावचा विरोध पत्करून हा रस्ता कशासाठी करण्यात येत आहे. गुरुवारी देखिल पोलिसांनी गावात येऊन दांडगाई करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे. ही माहिती पोलीस उपायुक्त यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने संबंधित पोलिसांना फोन करून त्यांचा समाचार घेतला आहे
मध्यतरी हा मास्टर प्लॅन गावात नको म्हणून नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते आता परत काहींनी वरिष्ठ व काही मंत्र्याना धरून हा कट रचत असल्याचे दिसून येत आहे. त्या नेत्यानेच पोलिसांना सांगून नागरिकांना धाक दाखविण्याचे सुरू केले आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मास्टर प्लॅन वर्षा आधीचा आणि नोटीस मात्र 5 मार्च च्या का कुठला न्याय त्यामुले गरिबांची घरे कोसळून विकास करण्यात येत असेल तर असला विकास नको आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.