बेळगाव लाईव्ह : जातीय जनगणना लवकरात लवकर लागू करा याबाबतीत राहुल गांधी यांच्याशी माझी चर्चा झाली आहे मात्र त्यांनी मला याबाबतीत कोणत्याही पत्र लिहिले नाही त्यांच्या संमतीनेच झाले आहे. असा निर्वाळा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिला.
रविवारी सकाळी कलामंदिर येथील नवीन व्यापारी संकुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला बेळगाव ला आले असता विमानतळावर माध्यमांशी ते बोलत होते.
जातीय गणनेच्या अहवालाची मूळप्रत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या घरी आहे, असे आर. अशोक यांचे विधान केले होते त्यावर बोलताना सिद्धरामय्या यांनी”आर. अशोक यांनी कधी खरे बोलले आहेत का? मूळप्रत आमच्या घरी असणे शक्य आहे का?”असा प्रतिप्रश्न करत
“सीलबंद कव्हरमधील अहवाल कॅबिनेटमध्ये सर्वांसमोर उघड केला होता.” “फक्त खोटे बोलणे हे भाजपच्या लोकांचे काम आहे. भाजपाचे लोक खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करत करतात असे करायला त्यांना आरएसएसने त्यांना सांगितले आहे असाही आरोप त्यांनी यावेळी केला.
जातीय गणनेवर कोणत्याही काँग्रेस आमदाराने विरोध केला नाही याशिवाय कॅबिनेट बैठकीत कोणी मोठ्या आवाजाने देखील बोलले नाही. मी माझे मत मानले आहे तुमचे मत मांडा असे सर्वानुमते निर्णय घेऊ असे बैठकीत सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले.
कोणत्याही जातीच्या लोकांना अन्याय होऊ नये. हा एक सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक सर्वेक्षण आहे.”
“कोणालाही अन्याय होऊ नये, हाच आमचा हेतू आहे. देशात समानता येणे आवश्यक आहे. सर्व जातीतील गरीबांना शिक्षण मिळाले पाहिजे.”
“गरीबांनी गरीबच राहिले पाहिजे का? मुस्लिमांना शिक्षण मिळाले पाहिजे का नाही? सर्व जातीतील गरीबांना शिक्षण मिळाले पाहिजे का नाही?” असाही प्रतिप्रश्न त्यांनी केला
