Wednesday, October 23, 2024

/

बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यासाठी तालुका म. ए. समिती आक्रमक

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव – वेंगुर्ला रस्त्याची अक्षरशः चाळण उडाली असून या रस्त्याच्या डागडुजीसाठी आजवर अनेकवेळा निवेदने देण्यात आली. गेल्या पंधरवड्यात विविध ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनीही जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला.

यानंतर रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली. मात्र या रस्त्याची उडालेली धूळधाण पाहता तात्पुरत्या डागडुजीचाही रंग उडाला आहे. यामुळे आता या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने पुढाकार घेतला असून प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम देत पंधरा दिवसांच्या आत रस्त्याचे कामकाज हाती न घेतल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याची गेल्या वर्षभरापासून धूळधाण उडाली आहे. यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे तर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे लोकांना या रस्त्याचा वापर करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे तालुका म. ए. समितीने पंधरा दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन देऊन दुरुस्तीची मागणी केली होती. पण रस्त्याची दुरूस्ती झालेली नाही.

पाऊसही थांबलेला नाही. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांच्या आत रस्ता काम करण्यात यावे, अन्यथा बेळगुंदी क्रॉस (हॉटेल मधुराजवळ) रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मंगळवारी (दि. 22) सार्वजनिक बांधकाम खात्याला दिला आहे. 7 नोव्हेंबर रोजी तालुका म. ए. समिती आणि युवा आघाडीतर्फे हे आंदोलन हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती समिती कार्याध्यक्ष संतोष मंडलिक यांनी दिली आहे.Mes meet

महिन्याभरापूर्वी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्वतः रस्त्याची पाहणी करून दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर तात्पुरती डागडुजी करण्यासाठी खडी टाकण्यात आली होती. मात्र या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ पाहता टाकण्यात आलेली खडी उघडली पडली. यामुळे वाहनचालकांची अधिकच कसरत होत असून रस्त्यावरील खड्डे, पसरलेली खडी, मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ यामुळे प्रत्येकालाच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

पावसाने अद्याप उघडीप न दिल्याने रस्त्याचे कामकाज सुरु करण्यात येणार नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविले आहे. मात्र तालुका म. ए. समितीने पुढील १५ दिवसांचा अल्टिमेटम देत रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

काळया दिनाची जनजागृती

तालुका महाराष्ट्र एकिकरण समिती यांच्या वतीने 1 नोव्हेंबर रोजी होणा काळ्या दिनाची जनजागृती जनजागती करण्यासाठी बेळगुंदी गावात समितीचे कार्याध्यक्ष, अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित राहुन गावातील समस्त कार्यकत्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक, किरण मोटणकर यांनी केले. संतोष मंडलीक  मनोहर किणेकर यांनी मार्गदर्शन केले. रामचंद्र पाटील यानी आभार व्यक्त करून ‘गावच्या वतीने पाठिंबा दर्शविला. यावेळी बेळगुंदी भागातील महाराष्ट्रकीकरण समितीचे विभाग कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.