आई दोन मुलांनी संपवले जीवन

0
2
 belgaum

बेळगाव लाईव्ह :कौटुंबिक वाद झाल्याने आईने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रायबाग तालुक्यातील बोमनाळ या गावी घडली आहे .

यल्लावा करीहोळ वय 30 असे आईचे नाव असून तर पाच वर्षाचा सात्विक व एक वर्षाचा मुतप्पा असे मयत दुर्दैवी मुलांची नावे आहेत.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील या गावातील रहिवासी यल्लवा करीहोळ या महिलेचा आपल्या पतीसोबत वारंवार भांडण तंटा होत होता यामुळे नैराश्यातून आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आज सकाळी आठच्या दरम्यान आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

 belgaum

घटनेची माहिती कळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला. घटनास्थळी रायबाग पोलीसानी भेट देऊन स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले.

यानंतर उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सदर घटना रायबाग पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत घडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.